शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याने घर देता, पण पूर्ण शहानिशा करूनच द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

तालुक्यात परप्रांतातून आलेले अनेक लोक वेगवेगळा व्यवसाय थाटून वास्तव्यास राहतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत व शहरात ते सुध्दा राहत असून एकमेकांच्या संपर्कात असतात. काही लोकांना २-३ किंवा ६ महिने आपला एखादा व्यवसाय करून आपल्या स्वगावी त्यांच्या प्रांतात परत निघून जायचे असते. यादरम्यान ते शहरातील एखाद्या घरमालकाशी संपर्क साधून भाड्याने खोली घेतात. या कालखंडात ते घरमालक व त्यांच्या कुटुंबाबद्दल बरीच माहिती प्राप्त करून घेतात. 

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  जर तुम्ही आपले घर भाड्याने देत असाल, तर त्या भाडेकरू व्यक्तीबद्दलची पूर्ण शहानिशा करूनच घर भाड्याने द्या, अन्यथा तुमच्यासोबत दगा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सध्या काही परप्रांतीय लोक सालेकसासह जिल्ह्यातील  इतर तालुकास्थळी किंवा प्रमुख गावात काही दिवस आपले ठाण मांडून दुष्कृत्य करून पळून जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात परप्रांतातून आलेले अनेक लोक वेगवेगळा व्यवसाय थाटून वास्तव्यास राहतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत व शहरात ते सुध्दा राहत असून एकमेकांच्या संपर्कात असतात. काही लोकांना २-३ किंवा ६ महिने आपला एखादा व्यवसाय करून आपल्या स्वगावी त्यांच्या प्रांतात परत निघून जायचे असते. यादरम्यान ते शहरातील एखाद्या घरमालकाशी संपर्क साधून भाड्याने खोली घेतात. या कालखंडात ते घरमालक व त्यांच्या कुटुंबाबद्दल बरीच माहिती प्राप्त करून घेतात. एवढेच नाही, तर त्यांच्याकडील मालमत्ता व प्रत्येक सदस्याचे मोबाईल नंबर मिळवून घेतात. परंतु याउलट आपले घरमालक हवी तेवढी शहानिशा न करता घर किंवा खोली भाड्याने देऊन टाकतात. तो कुठून आला, कोणत्या प्रांतातील आहे, त्याचे गाव कोणते, कुुटुंबातील लोक काय करतात, इकडे कशासाठी आला... याची माहिती घेत नाहीत. काही महिने व्यवस्थित वास्तव्य करून परत जाण्याची वेळ आली की, कोणते न कोणते मोठे नुकसान करून जातात. अशात त्यांची सखोल माहिती नसल्याने त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई सुध्दा करता येत नाही. सालेकसा तालुका तीन राज्यांच्या सीमेवर असून या तालुक्याची ७० टक्के सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याशी लागली आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या परप्रांतीय लोकांचा नेहमीच मोकाट वावर असतो. असे लोक अनेक वाईट कृत्ये करून निघून जातात व त्यांचा नंतर काही थांगपत्ता लागत नाही. काही परप्रांतीय ठाण मांडून गोलगप्पे, चाट, फळे, स्वीट मार्ट, उन्हाळ्यात कुल्फीची दुकाने व इतर व्यवसाय करतात. धंद्याचा काळ संपला की घरमालकासह इतरांना दगा देऊन ते पळून जातात.महिला-मुलींवर असते वक्रदृष्टी - परप्रांतातून आलेले विशेष करून छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातून आलेले लोक मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. सोबतच महिलांच्या दागिन्यांवर सुध्दा त्यांची वक्रदृष्टी राहते व ते कसेे हस्तगत करावेत, याच्या प्रयत्नात ते असतात. शहरात वेगवेगळ्या दुकानात जसे मिठाई दुकान, ऑटो दुरुस्ती केंद्र, कापड दुकान, हार्डवेअर इत्यादी दुकानांमध्ये काम करणारे अनेक युवक परप्रांतातील असून दुकानात येणाऱ्या महिला-मुलींवर वक्रदृष्टी ठेवून त्यांची फसवणूक करण्यासाठी प्रयत्न करतात. अशी काही प्रकरणे आता समोर सुध्दा आली आहेत. 

माहितीची नोंद असणे आवश्यकघरमालकाने खोली भाड्याने देताना त्या व्यक्तीची व्यक्तिगत व कौटुंबिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्या आधारकार्डची फोटोकॉपी, पासपोर्ट फोटो, शाळेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र व इतर आवश्यक माहितींचे प्रमाण गोळा करून घ्यावे व नंतरच खोली भाड्याने द्यावी. त्याचप्रमाणे दुकान मालकाने सुध्दा कोणत्याही युवकाला किंवा युवतीेला नोकरी देताना शहानिशा करणे गरजेचे आहे. अनेक वाईट घटना घडत असताना पोलिसांनी सुध्दा शहरात कोणता व्यवसाय करणारा कोण आहे, तो कोठून आला, याची माहिती गोळा केली पाहिजे किंवा घरमालकांना ही सूचना केली पाहिजे, असे कळविले आहे. असामाजिक तत्त्वांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच राज्याची सीमा ओलांडून तालुक्यात फिरत असणाऱ्या लोकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस