शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
3
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
4
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
5
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
6
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
7
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
8
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
9
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
10
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
11
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
12
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
13
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
14
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
15
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
17
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
18
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
19
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
20
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी पिक लागवडीवरील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:49 IST

मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

देवानंद शहारे ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत पिकांच्या लागवडीवर लावले निर्बंध हटविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सततच्या दुष्काळामुळे जलस्रोतांमध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिकांना पाणी देण्यास नकार दिला होता. शिवाय भूजल पातळी खालावल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईकडे पाहून उन्हाळी पीक न घेण्याचा आदेश काढण्यात आला होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्या ३० जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये सदर पिकांची लागवड करण्यास लावले निर्बंध हटविण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.खरीप हंगामात शेतकरी रोज आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत होता. मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकºयांना हाती आलेले पिक गमवावे लागले. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणातही मोबदला मिळाला नाही. ज्यांनी पीक लावले होते त्या पिकांवरही कीडरोगांनी आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड लागले. मागील चार दशकात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली होती.आता रबी व उन्हाळी धानपीक घेवून परिस्थिती सावरू असा विचार असतानाच १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रबी/उन्हाळी पिके लावण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश काढण्यात आले होते.अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंध हटविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीे ७ जानेवारी २०१८ चे पत्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे १७ नोव्हेंबर २०१७ च्या कार्यालयीन पत्रानुसार ते आदेश रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यात धान पिकांच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले. तसेच कीडरोगांमुळे हाती आलेले उत्पन्नही गेले. त्यानंतर आता उन्हाळी धानपिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार हेक्टर असताना शासनाने लागवड न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता उन्हाळी धानपीक लावण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.रब्बी पिकांची लागवड २४ हजार हेक्टरमध्येजिल्ह्यात लाखोळी, हरभरा, उळीद आदी कमी पाणी लागणाऱ्या रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८०० हेक्टर आहे. यापैकी २४ हजार हेक्टरवर रबी पिके लावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात कडधान्य, तृणधान्य व गळीताची धान्य लावली जातात. सात हजार हेक्टरमध्ये लाखोळी, नऊ हजार ८०० हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित काही क्षेत्रात इतर कमी पाणी लागणाºया पिकांची लागवड करण्यात आली आहे.