शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उन्हाळी पिक लागवडीवरील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:49 IST

मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

देवानंद शहारे ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत पिकांच्या लागवडीवर लावले निर्बंध हटविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सततच्या दुष्काळामुळे जलस्रोतांमध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिकांना पाणी देण्यास नकार दिला होता. शिवाय भूजल पातळी खालावल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईकडे पाहून उन्हाळी पीक न घेण्याचा आदेश काढण्यात आला होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्या ३० जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये सदर पिकांची लागवड करण्यास लावले निर्बंध हटविण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.खरीप हंगामात शेतकरी रोज आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत होता. मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकºयांना हाती आलेले पिक गमवावे लागले. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणातही मोबदला मिळाला नाही. ज्यांनी पीक लावले होते त्या पिकांवरही कीडरोगांनी आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड लागले. मागील चार दशकात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली होती.आता रबी व उन्हाळी धानपीक घेवून परिस्थिती सावरू असा विचार असतानाच १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रबी/उन्हाळी पिके लावण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश काढण्यात आले होते.अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंध हटविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीे ७ जानेवारी २०१८ चे पत्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे १७ नोव्हेंबर २०१७ च्या कार्यालयीन पत्रानुसार ते आदेश रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यात धान पिकांच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले. तसेच कीडरोगांमुळे हाती आलेले उत्पन्नही गेले. त्यानंतर आता उन्हाळी धानपिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार हेक्टर असताना शासनाने लागवड न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता उन्हाळी धानपीक लावण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.रब्बी पिकांची लागवड २४ हजार हेक्टरमध्येजिल्ह्यात लाखोळी, हरभरा, उळीद आदी कमी पाणी लागणाऱ्या रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८०० हेक्टर आहे. यापैकी २४ हजार हेक्टरवर रबी पिके लावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात कडधान्य, तृणधान्य व गळीताची धान्य लावली जातात. सात हजार हेक्टरमध्ये लाखोळी, नऊ हजार ८०० हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित काही क्षेत्रात इतर कमी पाणी लागणाºया पिकांची लागवड करण्यात आली आहे.