शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

उन्हाळी पिक लागवडीवरील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:49 IST

मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

देवानंद शहारे ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत पिकांच्या लागवडीवर लावले निर्बंध हटविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सततच्या दुष्काळामुळे जलस्रोतांमध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिकांना पाणी देण्यास नकार दिला होता. शिवाय भूजल पातळी खालावल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईकडे पाहून उन्हाळी पीक न घेण्याचा आदेश काढण्यात आला होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्या ३० जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये सदर पिकांची लागवड करण्यास लावले निर्बंध हटविण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.खरीप हंगामात शेतकरी रोज आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत होता. मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकºयांना हाती आलेले पिक गमवावे लागले. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणातही मोबदला मिळाला नाही. ज्यांनी पीक लावले होते त्या पिकांवरही कीडरोगांनी आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड लागले. मागील चार दशकात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली होती.आता रबी व उन्हाळी धानपीक घेवून परिस्थिती सावरू असा विचार असतानाच १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रबी/उन्हाळी पिके लावण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश काढण्यात आले होते.अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंध हटविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीे ७ जानेवारी २०१८ चे पत्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे १७ नोव्हेंबर २०१७ च्या कार्यालयीन पत्रानुसार ते आदेश रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यात धान पिकांच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले. तसेच कीडरोगांमुळे हाती आलेले उत्पन्नही गेले. त्यानंतर आता उन्हाळी धानपिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार हेक्टर असताना शासनाने लागवड न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता उन्हाळी धानपीक लावण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.रब्बी पिकांची लागवड २४ हजार हेक्टरमध्येजिल्ह्यात लाखोळी, हरभरा, उळीद आदी कमी पाणी लागणाऱ्या रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८०० हेक्टर आहे. यापैकी २४ हजार हेक्टरवर रबी पिके लावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात कडधान्य, तृणधान्य व गळीताची धान्य लावली जातात. सात हजार हेक्टरमध्ये लाखोळी, नऊ हजार ८०० हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित काही क्षेत्रात इतर कमी पाणी लागणाºया पिकांची लागवड करण्यात आली आहे.