शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

‘त्या’ तीनही नगरसेवकांच्या प्रकरणाची फेरसुनावणी

By admin | Updated: January 10, 2015 01:32 IST

तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत.

गोंदिया : तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत. ६ जानेवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांना सदस्यत्व पुन्हा बहाल झाले आहे. ११ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील पाच सदस्यांनी लोकतांत्रीक कॉंग्रेस नामक वेगळा दबाव गट तयार केला होता. या पाच सदस्यांनी केलेल्या या कृत्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली होती व संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. कालांतराने हे पाचही सदस्य कॉंग्रेस पक्षात परतून आले होते मात्र यातील भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांच्या पक्षांतराच्या या प्रकरणात तत्कालीन उप जिल्हाधिकारी कारकर यांच्याकडे सुनावणी सुरू होती. याप्रकरणी कारकर यांनी ठकरानी, मिश्रा व बंसोड यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची प्रत या सदस्यांनी २५ एप्रिल रोजी मिळाली व त्याविरोधात या तिघांनी नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयात अपील केली होती. आमची बाजू मांडू न देता जिल्हाधिकाऱ्यांनी आपला निर्णय सुनावल्याचा ठपका ठेवत तिघांनी दाखल केलेल्या अपीलच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या तिघा सदस्यांना त्यांचे सदस्यत्व पुन्हा प्राप्त झाले असून पालिके च्या कामकाजात आता ते पूर्वी प्रमाणेच सहभागी होऊ शकतील. (शहर प्रतिनिधी)