शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

पुनर्वसित श्रीरामनगरवासी स्वगावी जाण्यावर ठाम

By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST

पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली.

चिखली : पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे श्रीरामनगरवासी आपल्या स्वगावी कवलेवाडा, कालीमाटी, झनकारगोंदी येथे येत्या ५ जानेवारीला परत जाण्यावर ठाम आहेत.नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील अती संरक्षित नवक्षेत्रातील कवलेवाडा, कालीमाटी, झनकारगांदी या गावाचे पुनर्वसन सौंदड जवळ श्रीरामनगर येथे सन १२-१३ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करताना दिलेल्या आश्वासनानुसार पुनर्वसन करण्यात आले नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.पुनर्वसनामध्ये आदिवासी जनतेवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दि. १६/१२/१४ ला ग्रामसमिती श्रीरामनगर निवेदन देण्यात आले. निवेदनात उपस्थित केलेल्या मुद्यानुसार रहिवासी कुटुंब यादी, शेती, झाडे, घराची किंमत शेतातील विहिर, बोरवेल यांच्या मुल्यांकन करुन सन २००८ ला अधिसूचना जारी करण्यात आली. व सन २००८ ला ज्यांचे वय १८ वर्ष पुर्ण झाले अशा सर्वांना कुटुंब समान प्रतिकुंटुब पुनर्वसन पॅकेज देण्यात आले. पुनर्वसन करताना व गावकऱ्यांसमोर दोन पर्याय देण्यात आल. पर्याय क्र. नुसार रुपये १० लाखाच्या आता शासन पुनर्वसन करुन देईल. पर्यांय क्र. दोननुसार प्रतिकुटुंब रु. १० लाख रोख घेवून कुटुंब स्वच्छेने पुनर्वसीत होईल. यापैकी गावकऱ्यांनी पर्याय क्रमांक दोनची निवड केली. त्यानुसार अर्जुनी/मोरगाव येथील मालकनपुर येथे पुनर्वसन करण्सयात येईल, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वन विभागाकडून नियोजित व झाडे कापण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुनर्वसनासाठी मालकनपूरवासियांनी विरोध केल्याने त्यांचे पुनर्वसन सौंदड जवळील जागेवर करण्यात आले. त्यावेळी स्वत: राज्याचे प्रधान वनसचिव पुनर्वसन प्रकल्प अधिकारी गावात सभा घेवून जनतेला आश्वासन दिले की, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तसेच आदिवासी जनतेचे पारंपारिक हक्क व परंपरा यांना न वगळता प्रती कुटुंब एक हेक्टर शेतजमिन तसेच पर्याय क्रमांक एक नुसार मुलभूत गरजा देण्यात येईल असे सांगण्यात आले. लेखी स्वरुपात द्या असे गावकऱ्यांनी म्हटले असता आदिवासी पारंपारिक हक्काप्रमाणे आदिवासी कुटुंबाला त्यांची सहमती असल्यावरही भूमिहिन करता येत नाही असे सांगुन असे झाल्यास प्रशासनाविरोधात शासनाकडे न्याय मागू शकता, तो तुमचा आधिकार आहे, असे सांगल्याने गावकऱ्यांनी पुनर्वसनास मंजूरी दिली. मात्र या सर्व बाबींचा कोणताच विचार करण्यात आला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.