शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
2
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
5
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
6
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
7
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
8
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
9
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
10
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
11
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
12
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
13
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
14
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
15
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
16
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
17
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
18
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
19
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
20
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित श्रीरामनगरवासी स्वगावी जाण्यावर ठाम

By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST

पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली.

चिखली : पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे श्रीरामनगरवासी आपल्या स्वगावी कवलेवाडा, कालीमाटी, झनकारगोंदी येथे येत्या ५ जानेवारीला परत जाण्यावर ठाम आहेत.नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील अती संरक्षित नवक्षेत्रातील कवलेवाडा, कालीमाटी, झनकारगांदी या गावाचे पुनर्वसन सौंदड जवळ श्रीरामनगर येथे सन १२-१३ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करताना दिलेल्या आश्वासनानुसार पुनर्वसन करण्यात आले नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.पुनर्वसनामध्ये आदिवासी जनतेवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दि. १६/१२/१४ ला ग्रामसमिती श्रीरामनगर निवेदन देण्यात आले. निवेदनात उपस्थित केलेल्या मुद्यानुसार रहिवासी कुटुंब यादी, शेती, झाडे, घराची किंमत शेतातील विहिर, बोरवेल यांच्या मुल्यांकन करुन सन २००८ ला अधिसूचना जारी करण्यात आली. व सन २००८ ला ज्यांचे वय १८ वर्ष पुर्ण झाले अशा सर्वांना कुटुंब समान प्रतिकुंटुब पुनर्वसन पॅकेज देण्यात आले. पुनर्वसन करताना व गावकऱ्यांसमोर दोन पर्याय देण्यात आल. पर्याय क्र. नुसार रुपये १० लाखाच्या आता शासन पुनर्वसन करुन देईल. पर्यांय क्र. दोननुसार प्रतिकुटुंब रु. १० लाख रोख घेवून कुटुंब स्वच्छेने पुनर्वसीत होईल. यापैकी गावकऱ्यांनी पर्याय क्रमांक दोनची निवड केली. त्यानुसार अर्जुनी/मोरगाव येथील मालकनपुर येथे पुनर्वसन करण्सयात येईल, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वन विभागाकडून नियोजित व झाडे कापण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुनर्वसनासाठी मालकनपूरवासियांनी विरोध केल्याने त्यांचे पुनर्वसन सौंदड जवळील जागेवर करण्यात आले. त्यावेळी स्वत: राज्याचे प्रधान वनसचिव पुनर्वसन प्रकल्प अधिकारी गावात सभा घेवून जनतेला आश्वासन दिले की, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तसेच आदिवासी जनतेचे पारंपारिक हक्क व परंपरा यांना न वगळता प्रती कुटुंब एक हेक्टर शेतजमिन तसेच पर्याय क्रमांक एक नुसार मुलभूत गरजा देण्यात येईल असे सांगण्यात आले. लेखी स्वरुपात द्या असे गावकऱ्यांनी म्हटले असता आदिवासी पारंपारिक हक्काप्रमाणे आदिवासी कुटुंबाला त्यांची सहमती असल्यावरही भूमिहिन करता येत नाही असे सांगुन असे झाल्यास प्रशासनाविरोधात शासनाकडे न्याय मागू शकता, तो तुमचा आधिकार आहे, असे सांगल्याने गावकऱ्यांनी पुनर्वसनास मंजूरी दिली. मात्र या सर्व बाबींचा कोणताच विचार करण्यात आला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.