शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही, कासा, कटंगटोलाचे लवकर पुनर्वसन करा!

By admin | Updated: August 5, 2016 01:38 IST

तालुक्यातील पुरग्रस्त किन्ही,कासा व कटंगटोला या गावांचे शासनाने पुनर्वसन करण्याची पुरजोर मागणी आमदार गोपालदास अग्रवाल

गोंदिया : तालुक्यातील पुरग्रस्त किन्ही,कासा व कटंगटोला या गावांचे शासनाने पुनर्वसन करण्याची पुरजोर मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि.१) उचलून धरली. विशेष म्हणजे, त्यांच्या मागणीवरून विधानसभा अध्यक्षांनी या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी देण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभेच्या पावसाळी सत्रात आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील बडेगाव, किन्ही, कासा व कटंगटोला या गावांच्या पुनर्वसाचा प्रलंबीत मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दरवर्षी पावसाळ््यात बाघनदीच्या पुरामुळे या गावांतील सुमारे ५०० परिवारांची आपबीती मांडली. तसेच तत्कालीन कॉंग्रेस सरकारने काही वर्षांपूर्वी सुमारे २०० परिवारांचे बडेगाव येथून बनाथर या गावात पुनर्वसन केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, २५ आॅगस्ट २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला घेऊन विशेष बैठक घेतली होती व त्यात त्वरीत पुनर्वसनाचे निर्देश दिले होते. मात्र हा विषय बैठकी नंतर तेथेच संपला व त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. तर या गावांच्या पुनर्वसनासाठी शासकीय जागा उपलब्ध करविण्यात आल्याची माहिती देत या गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमास त्वरीत मंजूरी देण्याची मागणी केली. या विषयाला गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांनी तीन्ही गावांच्या पुनर्वसन प्रस्तावाला त्वरीत मंजूरी देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. त्यामुळे आता निश्चीतच या गावांच्या पुनर्वसनात गती येणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी) वादग्रळस्तांना अधिकाधिक मदत द्या! विशेष म्हणजे, जिल्ह्यात २१ मे रोजी आलेल्या वादळवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा विषयही मांडत आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर अधिकाधिक मदत करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी सत्रात केली. लक्षवेधी सूचनेत आमदार अग्रवाल यांनी हा विषय मांडला. यात त्यांनी वादळाने जिल्ह्यातील शेकडो घरांची पडझड झाली असतानाच पशुधनाचे नुकसान झाल्याचे सांगीतले. जिल्हाधिकाऱ्यांनी १ व २३ रोजी राज्य सरकारला सुमारे तीन कोटी रूपयांची मदत मंजूर करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र आता अडीच महिने लोटूनही नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने प्रथम प्राधान्य देत नुकसानग्रस्तांना अधिकाधिक आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावर मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लवकरच या विषयावर मंत्रीमंडळात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत आमदार सुनिल केदार, अब्दूल सत्तार, यशोमती ठाकूर यांनीही भाग घेतला होता.