शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही, कासा, कटंगटोलाचे लवकर पुनर्वसन करा!

By admin | Updated: August 5, 2016 01:38 IST

तालुक्यातील पुरग्रस्त किन्ही,कासा व कटंगटोला या गावांचे शासनाने पुनर्वसन करण्याची पुरजोर मागणी आमदार गोपालदास अग्रवाल

गोंदिया : तालुक्यातील पुरग्रस्त किन्ही,कासा व कटंगटोला या गावांचे शासनाने पुनर्वसन करण्याची पुरजोर मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि.१) उचलून धरली. विशेष म्हणजे, त्यांच्या मागणीवरून विधानसभा अध्यक्षांनी या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी देण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभेच्या पावसाळी सत्रात आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील बडेगाव, किन्ही, कासा व कटंगटोला या गावांच्या पुनर्वसाचा प्रलंबीत मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दरवर्षी पावसाळ््यात बाघनदीच्या पुरामुळे या गावांतील सुमारे ५०० परिवारांची आपबीती मांडली. तसेच तत्कालीन कॉंग्रेस सरकारने काही वर्षांपूर्वी सुमारे २०० परिवारांचे बडेगाव येथून बनाथर या गावात पुनर्वसन केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, २५ आॅगस्ट २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला घेऊन विशेष बैठक घेतली होती व त्यात त्वरीत पुनर्वसनाचे निर्देश दिले होते. मात्र हा विषय बैठकी नंतर तेथेच संपला व त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. तर या गावांच्या पुनर्वसनासाठी शासकीय जागा उपलब्ध करविण्यात आल्याची माहिती देत या गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमास त्वरीत मंजूरी देण्याची मागणी केली. या विषयाला गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांनी तीन्ही गावांच्या पुनर्वसन प्रस्तावाला त्वरीत मंजूरी देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. त्यामुळे आता निश्चीतच या गावांच्या पुनर्वसनात गती येणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी) वादग्रळस्तांना अधिकाधिक मदत द्या! विशेष म्हणजे, जिल्ह्यात २१ मे रोजी आलेल्या वादळवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा विषयही मांडत आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर अधिकाधिक मदत करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी सत्रात केली. लक्षवेधी सूचनेत आमदार अग्रवाल यांनी हा विषय मांडला. यात त्यांनी वादळाने जिल्ह्यातील शेकडो घरांची पडझड झाली असतानाच पशुधनाचे नुकसान झाल्याचे सांगीतले. जिल्हाधिकाऱ्यांनी १ व २३ रोजी राज्य सरकारला सुमारे तीन कोटी रूपयांची मदत मंजूर करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र आता अडीच महिने लोटूनही नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने प्रथम प्राधान्य देत नुकसानग्रस्तांना अधिकाधिक आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावर मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लवकरच या विषयावर मंत्रीमंडळात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत आमदार सुनिल केदार, अब्दूल सत्तार, यशोमती ठाकूर यांनीही भाग घेतला होता.