शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘रेफर टू’ जीएमसी नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 21:38 IST

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकमेव महिला रूग्णालय असलेल्या गंगाबाईत दररोज रूग्णांची रेलचेल असते. रूग्णांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन गंगाबाईत येणाºया रूग्णांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बहुतांश रूग्ण गंगाबाईत आल्यावरही कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात. त्यावरही जे रूग्ण आहेत ...

ठळक मुद्देमहत्त्वाच्या चाचण्या होत नाहीत: सात महिन्यांत ३४८ रूग्ण रेफर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकमेव महिला रूग्णालय असलेल्या गंगाबाईत दररोज रूग्णांची रेलचेल असते. रूग्णांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन गंगाबाईत येणाºया रूग्णांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बहुतांश रूग्ण गंगाबाईत आल्यावरही कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात. त्यावरही जे रूग्ण आहेत त्यापैकी अनेक गंभीर रूग्णांना डॉक्टरांचा अभाव, उपकरणांचा अभाव, साहित्याचा तुटवडा दाखवून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले जाते. या सात महिन्यांत गंगाबाईतून ३४८ रूग्णांना नागपूरला रेफर केले आहे.गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता सर्वच उपकरण कमी पडत आहेत. एकमेव असलेल्या महिला रूग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) नाही. या ठिकाणी व्हेंटीलेटर ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे गंभीर गर्भवती महिलांना नागपूरला पाठविले जाते. सिकलसेल तसेच एसएस पॅटर्न रूग्णांनाही या ठिकाणी दाखल केले जात नाही. गरोदर मातांना हृदयरोग असल्यास त्यांना नागपूरला रेफर केले जाते. अंडाशयाचा कर्करोग असणाºया महिला, गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या महिला दुसºया, तिसºया किंवा चवथ्या स्टेज मध्ये असल्या त्यांनाही रेफर केले जाते. रात्रीच्या वेळी बधिरीकरण तज्ज्ञ राहत नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रेफर केले जाते. किडणी निकामी झालेल्या, झटके येणाºया महिलांचा उपचार या ठिकाणी न करता त्यांना सरळ रेफर केले जाते.गंगाबाई स्त्री रूग्णालयातून जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात ३४८ रूग्णांना जीएमसी नागपूरसाठी रवाना केले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिला १९२, गंगाबाईत जन्माला येणारे व नवजात अतिदक्षता कक्षा (एसएनसीयू) मधील ६७ तर बालरोग विभागातील ८९ बालकांना रवाना करण्यात आले.नागपूरला जाण्यासाठी रूग्णवाहिका नाहीगंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांना डॉक्टरांकडून नागपूर रेफर केले जाते. परंतु गंगाबाईत रूग्णवाहिका उपलब्ध नसतात. शिशू सुरक्षा योजनेंतर्गत मोफत रूग्णवाहिका देणे आवश्यक असतानाही गंगाबाईतून रूग्णावाहीका देत नाही. या ठिकाणी तीन रूग्णवाहीकांपैकी दोन रूग्णवाहीका बंदच आहेत. तीन पैकी दोन रूग्ण वाहीका ३ लाख किमी.पेक्षा अधिक चालल्या आहेत. २ लाख ७५ हजार किमी.जुन्या रूग्णवाहिकांना वापरण्याची मनाई शासनाची असताना गंगाबाईत जीर्ण रूग्णवाहिकांमधून रूग्णांना सोडावे लागते. काही रूग्णांना रूग्णवाहिका मिळत नसल्याने जीव वाचविण्याच्या आकांतात नातेवाईक खासगी वाहनाने रूग्णांना नागपूरला नेतात.एनजीओकडे कंत्राटप्रसूती करण्यापूर्वी गर्भवती महिलांच्या सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे. परंतु गंगाबाईत बहुतांश चाचण्या होत नाही. या चाचण्या करण्यासाठी शासनाने एनजीओला कंत्राट देऊन सर्व चाचण्या मोफत करण्याची सोय करून दिली. मात्र त्या एनजीओचे कर्मचारी या तपासण्या करीत नसल्याची ओरड आहे. राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत अभियान संचालकांनी हिंद लॅबला सर्व रूग्णांच्या चाचण्या करण्याचे कंत्राट दिले. एलएफटी, केएफटी, ब्लड कल्चर, आयएनआर, पीएस फॉर एमपी अ‍ॅण्ड ओपीनियन ओअ‍ॅग्युलेशन प्रोफाईल, सीबीसी या चाचण्या करण्यात येत नाही. हिंद लॅबचे कर्मचारी दुपारी १ वाजता नंतर सेवा देत नाही. शासकीय महाविद्यालयाची सेंट्रल क्लीनिक लॅब केटीएस मध्ये कार्यान्वीत आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच सायंकाळी ५ वाजतानंतर कोणत्याच तपासण्या होत नाही. बहुतांश गरोदर स्त्रीयांचा रक्त तपासणी रिपोर्ट अभावी उपचार उशीरा होतो. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री विभाग कार्यान्वीत असून सुध्दा सदर तपासण्या होत नाही.गंगाबाईतील चाचण्या हिंद लॅबच्या कर्मचाºयांना करणे आवश्यक आहे. त्यांनी चाचण्या केल्या नाही व याबाबत तक्रार आल्यास पुढील कार्यवाही करू. जिल्ह्यातील आठ ते दहा रूग्णवाहीका मोडकळीस आल्या आहेत. मात्र गंगाबाईकडून प्रस्तावच आला नाही. यासंदर्भात आम्ही आपल्या स्तरावर उपाय योजना करू.डॉ. देवेंद्र पातुरकरजिल्हा शल्यचिकीत्सक, गोंदिया