शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

‘रेफर टू गोंदिया’मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:00 IST

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते.

ठळक मुद्देवेळेवर उपचार मिळण्याचा अभाव : आरोग्य विभागाचा कानाडोळा

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. या प्रकारामुळे गोंदिया येथे नेत असताना बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाºयांच्या रेफर टू गोंदियामुळे एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.सालेकसा तालुक्याचा सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून दुर्गम आहे. या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात सर्वाधिक सर्प दंशाचा घटना घडतात. सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर योग्य औषधोपचार मिळाला तर त्याला वाचविता येऊ शकते. परंतु या तालुक्यात सर्प दंश झालेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र तिथे सुध्दा उपचाराची सोय नसल्याने या रुग्णांना बरेचदा रेफर टू गोंदिया केले जाते.परिणामी रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी सालेकसापासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या चांदसूरज गावातील एका ११ व्या वर्गात शिकणाºया विद्यार्थिनीला सायंकाळच्या वेळेत विषारी सापाने चावा घेतला. तिला आधी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसानंतर ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि त्यानंतर रेफर टू गोंदिया असा प्रवासाला तोंड देण्याची वेळ आली.अखेर तिचा वाटेतच मृत्यू झाला.प्रसुतीकरिता येणाºया महिलांना सुध्दा याच समस्येला तोंड द्यावे लागते. आई आणि बाळ सुखरुप राहावे या अपेक्षेने लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे गर्भवती महिलांना घेवून येतात. परंतु येथे आल्यावर अनेक रुग्णांना रेफर टू गोंदियाची वाट दाखविली जाते. तालुक्यात सामान्य प्रसुती करण्याची सोय आहे. त्यामुळे गर्भवती महिला रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जाते.५० कि.मी. प्रवासाचा धोकासालेकसा ते गोंदिया हे अंतर जवळपास ५० कि.मी.चे आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना उपचारासाठी ५० कि.मी.चे अंतर पार करण्याचा धोका पत्थकारावा लागतो. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी सोनपुरी येथील एका गर्भवती महिलेला तेथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी भर्ती करण्यात आले. त्या ठिकाणी सामान्य प्रसुतीची वाट बघता बघता पाच तास लोटले. तेव्हा आरोग्य सेविकेने सदर महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात दोन तास ठेवून त्या महिलेला गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु गोंदिया पोहोचण्यापूर्वीच ती महिला आणि तिचे बाळ दगावले.जर ग्रामीण रुग्णालयात सीजर शस्त्रक्रियेची सोय असती तर तिची प्रसुती सुरक्षित झाली असती.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल