शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘रेफर टू गोंदिया’मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:00 IST

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते.

ठळक मुद्देवेळेवर उपचार मिळण्याचा अभाव : आरोग्य विभागाचा कानाडोळा

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. या प्रकारामुळे गोंदिया येथे नेत असताना बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाºयांच्या रेफर टू गोंदियामुळे एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.सालेकसा तालुक्याचा सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून दुर्गम आहे. या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात सर्वाधिक सर्प दंशाचा घटना घडतात. सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर योग्य औषधोपचार मिळाला तर त्याला वाचविता येऊ शकते. परंतु या तालुक्यात सर्प दंश झालेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र तिथे सुध्दा उपचाराची सोय नसल्याने या रुग्णांना बरेचदा रेफर टू गोंदिया केले जाते.परिणामी रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी सालेकसापासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या चांदसूरज गावातील एका ११ व्या वर्गात शिकणाºया विद्यार्थिनीला सायंकाळच्या वेळेत विषारी सापाने चावा घेतला. तिला आधी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसानंतर ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि त्यानंतर रेफर टू गोंदिया असा प्रवासाला तोंड देण्याची वेळ आली.अखेर तिचा वाटेतच मृत्यू झाला.प्रसुतीकरिता येणाºया महिलांना सुध्दा याच समस्येला तोंड द्यावे लागते. आई आणि बाळ सुखरुप राहावे या अपेक्षेने लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे गर्भवती महिलांना घेवून येतात. परंतु येथे आल्यावर अनेक रुग्णांना रेफर टू गोंदियाची वाट दाखविली जाते. तालुक्यात सामान्य प्रसुती करण्याची सोय आहे. त्यामुळे गर्भवती महिला रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जाते.५० कि.मी. प्रवासाचा धोकासालेकसा ते गोंदिया हे अंतर जवळपास ५० कि.मी.चे आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना उपचारासाठी ५० कि.मी.चे अंतर पार करण्याचा धोका पत्थकारावा लागतो. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी सोनपुरी येथील एका गर्भवती महिलेला तेथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी भर्ती करण्यात आले. त्या ठिकाणी सामान्य प्रसुतीची वाट बघता बघता पाच तास लोटले. तेव्हा आरोग्य सेविकेने सदर महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात दोन तास ठेवून त्या महिलेला गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु गोंदिया पोहोचण्यापूर्वीच ती महिला आणि तिचे बाळ दगावले.जर ग्रामीण रुग्णालयात सीजर शस्त्रक्रियेची सोय असती तर तिची प्रसुती सुरक्षित झाली असती.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल