शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

‘रेफर टू गोंदिया’मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:00 IST

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते.

ठळक मुद्देवेळेवर उपचार मिळण्याचा अभाव : आरोग्य विभागाचा कानाडोळा

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. या प्रकारामुळे गोंदिया येथे नेत असताना बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे येथील आरोग्य अधिकाºयांच्या रेफर टू गोंदियामुळे एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.सालेकसा तालुक्याचा सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून दुर्गम आहे. या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात सर्वाधिक सर्प दंशाचा घटना घडतात. सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर योग्य औषधोपचार मिळाला तर त्याला वाचविता येऊ शकते. परंतु या तालुक्यात सर्प दंश झालेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र तिथे सुध्दा उपचाराची सोय नसल्याने या रुग्णांना बरेचदा रेफर टू गोंदिया केले जाते.परिणामी रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी सालेकसापासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या चांदसूरज गावातील एका ११ व्या वर्गात शिकणाºया विद्यार्थिनीला सायंकाळच्या वेळेत विषारी सापाने चावा घेतला. तिला आधी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसानंतर ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि त्यानंतर रेफर टू गोंदिया असा प्रवासाला तोंड देण्याची वेळ आली.अखेर तिचा वाटेतच मृत्यू झाला.प्रसुतीकरिता येणाºया महिलांना सुध्दा याच समस्येला तोंड द्यावे लागते. आई आणि बाळ सुखरुप राहावे या अपेक्षेने लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे गर्भवती महिलांना घेवून येतात. परंतु येथे आल्यावर अनेक रुग्णांना रेफर टू गोंदियाची वाट दाखविली जाते. तालुक्यात सामान्य प्रसुती करण्याची सोय आहे. त्यामुळे गर्भवती महिला रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जाते.५० कि.मी. प्रवासाचा धोकासालेकसा ते गोंदिया हे अंतर जवळपास ५० कि.मी.चे आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना उपचारासाठी ५० कि.मी.चे अंतर पार करण्याचा धोका पत्थकारावा लागतो. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी सोनपुरी येथील एका गर्भवती महिलेला तेथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी भर्ती करण्यात आले. त्या ठिकाणी सामान्य प्रसुतीची वाट बघता बघता पाच तास लोटले. तेव्हा आरोग्य सेविकेने सदर महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयात दोन तास ठेवून त्या महिलेला गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु गोंदिया पोहोचण्यापूर्वीच ती महिला आणि तिचे बाळ दगावले.जर ग्रामीण रुग्णालयात सीजर शस्त्रक्रियेची सोय असती तर तिची प्रसुती सुरक्षित झाली असती.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल