शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

रेड झोनमधील कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जिल्हा परिषदेकडे पुर्णत: दुर्लक्ष असून कोरोना काळात त्यांनी कधीही जिल्हा परिषदेकडे लक्ष दिले नसल्याची ओरड काही जि.प.चे पदाधिकारीच करीत आहेत. जि.प.अधिकाऱ्यांच्या वेळ काम काढू धोरणामुळे अनेक कामांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे गेल्या २ वर्षांत जिल्हा परिषदेचा विकासही रखडला आहे.

ठळक मुद्देकारवाही करण्यासाठी बघ्याची भूमिका : कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यातही कुठल्याही झोनमधील नागरिकांना इतर जिल्ह्यात प्रवेशबंदी कायम आहे. मात्र रेडझोनमध्ये असलेल्या नागपूर येथील काही अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदसह येथील विविध कार्यालयात वावरत आहेत. दर आठवड्याला ते ये-जा करीत असल्याने संबंधित विभाग व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेतील या प्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे सपशेल दुर्लक्ष आहे.जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जिल्हा परिषदेकडे पुर्णत: दुर्लक्ष असून कोरोना काळात त्यांनी कधीही जिल्हा परिषदेकडे लक्ष दिले नसल्याची ओरड काही जि.प.चे पदाधिकारीच करीत आहेत. जि.प.अधिकाऱ्यांच्या वेळ काम काढू धोरणामुळे अनेक कामांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे गेल्या २ वर्षांत जिल्हा परिषदेचा विकासही रखडला आहे. त्यातच सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती भयावह असून सरकारने जे अधिकारी-कर्मचारी जिथे अडकले त्यांना तिथेच राहण्याची संधी देत ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्यातील ‘लॉकडाऊन’दरम्यान बहुतांश मुख्यालयी राहत नसलेल्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.परंतु गोंदिया जिल्हा परिषदेतील बहुतांश विभागातील कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून रेड व आॅरेंजझोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात राहून किंवा तिथून आडमार्गाने ये-जा करून कार्यालय गाठले आहे. याच आठवड्यात समाजकल्याण विभागात तर चक्क रेडझोनमध्ये असलेल्या नागपूरातून आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन स्वाक्षरी करून कार्यालयातून बेपत्ता झाल्याचेही चित्र गुरूवारी पाहयला मिळाले.या विभागात तर रेडझोनमध्ये असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आल्यानंतर होम क्वारटांईन राहण्याऐवजी कार्यालयात हजेरी लावल्याची माहिती पुढे आली आहे. अशीच परिस्थिती जिल्हा परिषदेतील अनेक विभागांत असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेतील या सावळा गोंधळावर सीईओंचे दुर्लक्ष असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जि.प.चे काही सदस्य सुध्दा नाराज आहेत.२२ मार्च रोजी ‘लॉकडाऊन’ची घोषणा झाली तेव्हापासून अनेक कर्मचारी नागपूर व भंडारा येथेच अडकले होते. त्यापैकी बहुतांश कर्मचारी १४ व १५ एप्रिल रोजी जिल्ह्यात साकोली टोलनाक्यावरून व इतर मार्गाने दाखल झालेत. त्यांनाही कार्यालयात प्रवेश दिला गेला. मात्र क्वारटांईन करण्यात आले नसल्याचेही समोर आले आहे. तर काही कर्मचारी अजूनही २२ मार्चपासून गेलेत ते आलेले नाहीत.सध्या ३३ टक्के कर्मचारी कार्यालयात असायला हवे. यामध्ये दररोज आळीपाळीने त्यांना बोलावण्यात यावे असे असताना काही कर्मचाºयांना दररोज त्या गैरहजर कर्मचाऱ्यांमुळे यावे लागत आहे. यावरुन मुख्यालयी राहण्याचे फक्त कागदोपत्री देखावे करून मुख्यालयी न राहता आपल्या मूळगावी असलेल्यांवर सीईओ कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद