शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST

जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना बाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोना ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचार बाधितांचा मृत्यू : ११ दिवसात १४१० वर रुग्णाची नोंद, गोंदिया शहरात सर्वाधिक १६९ कोरोना रुग्ण, संसर्गात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचे आकडे दररोज नवीन रेकार्ड करीत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.११) रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर चार बाधितांचा मृत्यू झाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असून सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे.त्यामुळे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना बाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोना ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. १ ते ११ सप्टेंबर दरम्यान २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्याच्या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर मागील अकरा दिवसात २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. १४१० वर रुग्णांची नोंद झाली आहे.कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना दुसरीकडे मात्र आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुढे येत आहे.त्यामुळे अनेक जण कोरोनाची लक्षणे दिसत असताना तपासणी करण्यासाठी जात नसल्याने संसर्ग वाढण्यास मदत होत आहे.कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना आऊट कंट्रोल झाला आहे.कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्षजिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष देखील आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आणि शहरातील बाजारपेठेतील काही व्यावसायीकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.ऐवढेच नव्हे तर मेडिकलमध्ये सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करुन त्यांची कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे. तसे केल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास मदत होवू शकते. मात्र याकडेच दुर्देवाने दुर्लक्ष होत आहे.पालकमंत्र्यांनी सोडले जिल्ह्याला वाऱ्यावरजिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार दररोज पुढे आहे.जिल्ह्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. ही पदे अजूनही भरण्यात आली नसल्याने कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यास यंत्रणा अपुरी पडत असून कार्यरत आरोग्य कर्मचारी तणावाखाली वावरत आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेवून युध्द पातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र तसे काहीच होताना दिसत नसून पालकमंत्र्यांनी जिल्हा वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या