शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

आजपासून बारावीची परीक्षा : २३ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी ६९ केंद्रगोंदिया : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. यंदा एकाही केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार घडू नये यासाठी यंत्रणेला योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरारी पथकांना तालुके नेमून देण्यात आले असून केंद्रांवरही चोख बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरिक्त केंद्र संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह साहित्य) आढळल्यास ‘सामूहिक कॉपी’ सुरू असल्याचे गृहित धरून कारवाई केली जाणार आहे. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये, प्रवेश पत्र व पेन घेऊन यावे. ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मागच्या वर्षी रसायनशास्त्राच्या पेपरला कोसमतोंडी येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी करताना पकडण्यात आले होते. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाभर ६९ केंद्र यावर्षी बारावीचे २३ हजार २१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)सात भरारी पथकांची गस्तदहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक असे सात पथक विविध केंद्रांवर सतत गस्त घालणार आहेत.‘त्या’ १८९ विद्यार्थ्यांचा निकाल लागलाच नाही मागच्या वर्षी कोसमतोंडी येथील फुलीचंद भगत कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या पेपरला सामूूहिक कॉपी करताना १८९ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. भरारी पथकाने त्या १८९ विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रार केली. न्यायालयातूनही पथकाच्या बाजूने निकाल देण्यात आला. मात्र कॉपी करणाऱ्या त्या १८९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही लागला नाही. यंदा त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.