शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

आजपासून बारावीची परीक्षा : २३ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी ६९ केंद्रगोंदिया : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. यंदा एकाही केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार घडू नये यासाठी यंत्रणेला योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरारी पथकांना तालुके नेमून देण्यात आले असून केंद्रांवरही चोख बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरिक्त केंद्र संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह साहित्य) आढळल्यास ‘सामूहिक कॉपी’ सुरू असल्याचे गृहित धरून कारवाई केली जाणार आहे. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये, प्रवेश पत्र व पेन घेऊन यावे. ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मागच्या वर्षी रसायनशास्त्राच्या पेपरला कोसमतोंडी येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी करताना पकडण्यात आले होते. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाभर ६९ केंद्र यावर्षी बारावीचे २३ हजार २१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)सात भरारी पथकांची गस्तदहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक असे सात पथक विविध केंद्रांवर सतत गस्त घालणार आहेत.‘त्या’ १८९ विद्यार्थ्यांचा निकाल लागलाच नाही मागच्या वर्षी कोसमतोंडी येथील फुलीचंद भगत कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या पेपरला सामूूहिक कॉपी करताना १८९ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. भरारी पथकाने त्या १८९ विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रार केली. न्यायालयातूनही पथकाच्या बाजूने निकाल देण्यात आला. मात्र कॉपी करणाऱ्या त्या १८९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही लागला नाही. यंदा त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.