शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

भजन कीर्तनातून फोडली समस्यांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:49 IST

भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन गोंदिया तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन गोंदिया तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.माजी आ.राजेंद्र जैन,दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पटले, प्रेमकुमार रहांगडाले,जितेंद्र टेंभरे यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात रास्ता आंदोलन करण्यात आले.या आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच भजन, कीर्तन सादर करुन जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात भजन मंडळ सुध्दा सहभागी झाले होते.या आंदोलनासाठी समस्यांना वाचा फोडणारी भजने सुध्दा तयार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात यावे, कृषी पंपासाठी शेतकºयांना लागू केलेली सौरपंपाची अट रद्द करावी, एम.आय.डी.सी.तील टीम फॅरो प्रकल्प बंद पडला असल्याने येथे कार्यरत मजूर बेरोजगार झाले असून त्यांना रोजगार उपलब्ध करु द्यावा, संग्रामपूर, हरि तलाव, रानी तलावात खैरबंदा जलाशयातून पाईप लाईनच्या माध्यमातून उर्ध्वनलिका तयार करुन पाणी सोडण्यात यावे, दवनीवाडा तालुका तयार करण्यात यावा, सहेसपूर येथील शेतकºयांना खैरबंदा जलाशयाचे पाणी देण्यात यावे, साईटोला रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, पागंडी जलाशयाच्या माध्यमातून डोंगरगाव, मुंडीपार, सेजगाव, भानपूर येथील शेतकºयांना सिंचनासाठी नियमित पाणी देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांना थकलेले हप्ते त्वरीत देण्यात यावे, धापेवाडा, लोधीटोला, येथे वैनगंगा नदीच्या काठालगत सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.या आंदोलनात नितीन टेंभरे, कैलाश पटले, प्रदीप रोकडे,अशोक डोंगरे, के.बी.बन्सोड, चाणाक्ष कांबळे, गोविंद बावनकर, हितेशकुमार पताहे, रविकुमार पटले, दुलीचंद चौरीवार, संतोष उके, भोजराज रहांगडाले,चेतना पटले, फुलवंता बिजेवार, सविता टेंभरे, हेमलता बारेवार, सुनिता डोंगरे, ग्यानीराम खोटेले, प्रदीप शहारे, घनश्याम पटले, शामलाल साऊस्कर, दीपक कावडे, प्रकाश मेश्राम, घनश्याम चौधरी, युनुस शेख, ईश्वरी पटले, शैलेश वासनिक यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.खरीपाप्रमाणेच रब्बी धानाला बोनस द्याशासनाने खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला. मात्र जिल्ह्यात रब्बी हंगामात सुध्दा मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जात असताना रब्बी हंगामासाठी शासनाने बोनस जाहीर केला नाही. त्यामुळे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय असून रब्बी हंगामातील धानाला बोनस देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.दुष्काळी परिस्थिती जाहीर कराजिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.त्यामुळे शासनाने पीक परिस्थितीचा आढावा घेवून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन उपाय योजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केली.