शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

रानातील गुणकारी रानमेवा यंदा लांबला

By admin | Updated: May 1, 2015 00:10 IST

टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे

गोंदिया : जिल्ह्याला लाभलेल्या मोठ्या जंगल क्षेत्रात व इतरत्रही टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे व शेंगा हा जंगलातील रानमेवा दरवर्षी मार्च मिहन्यापासून मे, जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परंतु यावर्षी पडलेला कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम रानातील फळांवरही झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे कुटुंब हवालिदल झाले आहे.मोलमजुरी करून आपला उदरिनर्वाह करणाऱ्याया डोंगर कपारीतील आदिवासींना शेतीचा हंगाम संपला की फेब्रुवारी, मार्च महिन्यात वनातील रानमेव्यापासून चांगला रोजगार मिळून आर्थिक लाभ होतो. टेंभूर व भाजीसाठी उपयुक्त फळ विकण्यापासून या हंगामाला सुरूवात होते. यानंतर चारं, चारोळी, डिंक, आवळा, करवंद, बिबुली, जांभुळ, मोहफूल, आंबा, फणस, विलायती चिंच, कवठं, गावरानी चिंच, मध याप्रमाणे रानमेवा विक्र ीला सुरूवात होते. यावर्षी एप्रिल मिहन्याचा शेवटचा आठवडा संपत असताना काही भआगात टेंबरं विक्रीला बाजारात आले आहेत. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे फळांचा मोहर व फुले गळून गेल्याने आणि वातावरणात वारंवार बदल होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत हे सर्व फळं कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्यात चारे, बिबुली ही फळे विक्रीला येतात. मात्र एप्रिल महिना संपत असतानाही अद्याप कच्चीच फळे झाडाला लागलेली दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसिर्गक बदलामुळे फळांचा आकारही यावर्षी लहान झाला आहे. झाडातच ताकद न उरल्याने ही फळे मोठी होऊन पिकायला आणखी काही दिवस लागणार आहे. परिणामी यावर्षी प्रत्येक फळांचा हंगाम एक मिहना उशीराने सुरू होणार आहे. रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे मुलांना खाऊ घालण्यापेक्षा गुणकारी वन औषधी असलेला रानमेवा मुलांना खाऊ घालण्याकडे पालकांचा कल जास्त असतो. त्यामुळे या रानमेव्याला बाजारात भावही चांगला मिळतो.जिल्ह्यातील बरेच कुटुंब या रानमेव्याच्या विक्र ीतून पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. आदिवासी बांधव या रानमेव्यातून हजारो रूपयाची आर्थिक उलाढाल करीत असतात. परंतु यावर्षी रानमेव्याचा हंगाम लांबल्याने आणि ही फळेही कमी प्रमाणात असल्याने या रानमेव्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)