शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:00 IST

तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.

ठळक मुद्देसहेषराम कोरोटे : न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

ऑनलाईन लोकमतआमगाव : तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात येथील आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार राठोड यांना देण्यात आले.निवेदनातून तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार पिडित शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेसाठी केंद्र व राज्य शासनाने कुठल्याही नवीन योजना काढल्या नाही. तर पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी. कृषी पंपधारक शेतकºयांचे विद्युत बिल माफ करावे, आमगाव तालुक्यातील गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरु करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, खनन उत्खनन बाबतचे परिपत्रक रद्द करावे, दुष्काळ कर आकारणी बंद करणे, बेरोजगारांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, तालुक्यात उद्योग धंदे उभारण्यात यावे, १५ लाख रुपये जनधन खात्यात जमा करावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, राजकुमार फुंडे, इशुलाल भालेकर, राधाकिसन चुटे, संजय डोये, दिगंबर कोरे, हुकुमचंद बहेकार, यादनलाल बनोठे, डॉ. राजकुमार चुटे, अजय खेतान, सरपंच उषा भांडारकर, संजय बहेकार, बळीराम कोटवार, दिलीप बैस, रवि अग्रवाल, महेश उके, लोकेश अग्रवाल, राजा मिश्रा, दिपक शर्मा, गणेश हुकरे, आनंद शेंडे, बंशीधर अग्रवाल, खेमचंद खोब्रागडे, प्रभादेवी उपराडे, नरेश बोपचे, आशिष टेंभुर्णे, रितेश रामटेके यांचा समावेश होता.