शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पावसाची जिल्ह्याकडे पुन्हा पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे.

ठळक मुद्देकेवळ २५ टक्के रोवण्या पूर्ण । पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवरील संकटात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. परिणामी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत केवळ २५ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ७५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. पावसाने पाठ दाखविल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे तसेच सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. मागील पंधरा दिवसांपासून अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. याचा रोवणीच्या कामावर परिणाम होत आहे.येत्या चार पाच दिवसात दमदार पाऊस न झाल्यास सुरू असलेल्या रोवण्या देखील पूर्णपणे खोळंबण्याची शक्यता आहे.आकाशात दररोज ढग दाटून येत असल्याने दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची आशा देखील फोल ठरत आहे.यंदा सुरूवातीपासूनच पावसाने पाठ दाखविल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते. जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपत आला तरी सरासरीच्या केवळ २६०.६७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालली आहे. ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आणि सध्या स्थितीत पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे. मागील वर्षी देखील सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने रोवणीची कामे वेळेत पूर्ण झाली होती. पण यंदा चित्र फारच बिकट आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कशी बशी आपली रोवणी आटोपत आहेत. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्यां शेतकऱ्यांच्या रोवण्या पूर्ण खोळंबल्याचे चित्र आहे. येत्या पाच सहा दिवसात दमदार पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहे.उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताधानाच्या रोवणीसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो. मात्र त्यापेक्षा उशिर झाल्यास त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत रोवणीची कामे आटोपण्याची शेतकऱ्यांची लगबग असते. यंदा जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. तर कडक उन्ह तापत असल्याने बांध्यां सुध्दा कोरड्या पडत आहे. पऱ्हे देखील वाळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान पाऊस लांबल्यास धानाच्या उत्पादनावर १० ते २० टक्के परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात अद्यापही रोवणी योग्य पाऊस झालेला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस बरसण्याची अपेक्षा होती. मात्र अजुनही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. तर पऱ्हावर सुध्दा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊस