शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची जिल्ह्याकडे पुन्हा पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे.

ठळक मुद्देकेवळ २५ टक्के रोवण्या पूर्ण । पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवरील संकटात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. परिणामी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत केवळ २५ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ७५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. पावसाने पाठ दाखविल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे तसेच सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. मागील पंधरा दिवसांपासून अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. याचा रोवणीच्या कामावर परिणाम होत आहे.येत्या चार पाच दिवसात दमदार पाऊस न झाल्यास सुरू असलेल्या रोवण्या देखील पूर्णपणे खोळंबण्याची शक्यता आहे.आकाशात दररोज ढग दाटून येत असल्याने दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची आशा देखील फोल ठरत आहे.यंदा सुरूवातीपासूनच पावसाने पाठ दाखविल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते. जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपत आला तरी सरासरीच्या केवळ २६०.६७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालली आहे. ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आणि सध्या स्थितीत पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे. मागील वर्षी देखील सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने रोवणीची कामे वेळेत पूर्ण झाली होती. पण यंदा चित्र फारच बिकट आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कशी बशी आपली रोवणी आटोपत आहेत. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्यां शेतकऱ्यांच्या रोवण्या पूर्ण खोळंबल्याचे चित्र आहे. येत्या पाच सहा दिवसात दमदार पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहे.उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताधानाच्या रोवणीसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो. मात्र त्यापेक्षा उशिर झाल्यास त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत रोवणीची कामे आटोपण्याची शेतकऱ्यांची लगबग असते. यंदा जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. तर कडक उन्ह तापत असल्याने बांध्यां सुध्दा कोरड्या पडत आहे. पऱ्हे देखील वाळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान पाऊस लांबल्यास धानाच्या उत्पादनावर १० ते २० टक्के परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात अद्यापही रोवणी योग्य पाऊस झालेला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस बरसण्याची अपेक्षा होती. मात्र अजुनही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. तर पऱ्हावर सुध्दा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊस