शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी यंदाही रब्बीचा हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:02 IST

शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यात सातत्याने घट : पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगाम संकटात आला आहे.मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खरीपाचा हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. तर प्रकल्पांत पाणी साठाच नसल्याने रब्बीसाठी पाणी देता आले नव्हते. एवढेच काय शहरातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदा मात्र चांगला पाऊस बरसला.पावसामुळे जिल्ह्यात खरीपाचा हंगाम चांगला होईल अशी आशा शेतकºयांना होती. मात्र शेवटच्या एका पाण्यासाठी पीक तहानलेले असताना पावसाने दडी मारली. एका पाण्यासाठी पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला व पिकांची नुकसान झाले. मात्र पिकांना पाणी लागत असल्याने पाटबंधारे विभागाकडून आताही पाणी सोडले जात आहे.यामुळे मात्र प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. असेच सुरू राहील्यास जिल्ह्यातील उन्हाळा बघता त्यासाठीही पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास उन्हाळ््यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. परिणामी, प्रकल्पांतील पाणीसाठा वाचवून ठेवण्यासाठी रब्बीला हंगामासाठी पाणी देता येणार नाही. मागील वर्षीही प्रकल्पांत पाणी नसल्यामुळे रब्बीला पाणी दिले नव्हते. त्यामुळे आता रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतो त्यावर हे अवलंबून राहणार.भविष्यातील पाण्याची गरज बघता रब्बीचा हंगाम धोक्यात दिसून येत आहे.शहरासाठी पुजारीटोला धरणाचे पाणीमागील उन्हाळ््यात जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरात पाणी पेटले होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणक डून शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली होती. यावर तोडगा म्हणून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणावे लागले होते. त्यावेळी पुजारीटोला प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा होता व त्यामुळेच शहराची तहान भागविता आली होती. त्यादृष्टीने यंदाही प्रकल्पात पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहराच्या पाणी समस्या काय रूप घेणार याची कल्पना न केलेलीच बरी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई