शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाअभावी यंदाही रब्बीचा हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:02 IST

शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यात सातत्याने घट : पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगाम संकटात आला आहे.मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खरीपाचा हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. तर प्रकल्पांत पाणी साठाच नसल्याने रब्बीसाठी पाणी देता आले नव्हते. एवढेच काय शहरातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदा मात्र चांगला पाऊस बरसला.पावसामुळे जिल्ह्यात खरीपाचा हंगाम चांगला होईल अशी आशा शेतकºयांना होती. मात्र शेवटच्या एका पाण्यासाठी पीक तहानलेले असताना पावसाने दडी मारली. एका पाण्यासाठी पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला व पिकांची नुकसान झाले. मात्र पिकांना पाणी लागत असल्याने पाटबंधारे विभागाकडून आताही पाणी सोडले जात आहे.यामुळे मात्र प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. असेच सुरू राहील्यास जिल्ह्यातील उन्हाळा बघता त्यासाठीही पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास उन्हाळ््यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. परिणामी, प्रकल्पांतील पाणीसाठा वाचवून ठेवण्यासाठी रब्बीला हंगामासाठी पाणी देता येणार नाही. मागील वर्षीही प्रकल्पांत पाणी नसल्यामुळे रब्बीला पाणी दिले नव्हते. त्यामुळे आता रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतो त्यावर हे अवलंबून राहणार.भविष्यातील पाण्याची गरज बघता रब्बीचा हंगाम धोक्यात दिसून येत आहे.शहरासाठी पुजारीटोला धरणाचे पाणीमागील उन्हाळ््यात जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरात पाणी पेटले होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणक डून शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली होती. यावर तोडगा म्हणून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणावे लागले होते. त्यावेळी पुजारीटोला प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा होता व त्यामुळेच शहराची तहान भागविता आली होती. त्यादृष्टीने यंदाही प्रकल्पात पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहराच्या पाणी समस्या काय रूप घेणार याची कल्पना न केलेलीच बरी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई