शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

रबीची लागवड १८ टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच

उन्हाळी भातपीक : जिल्ह्यात ३६५ हेक्टरवर रोपवाटिकादेवानंद शहारे - गोंदियाखरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रबीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घटणार आहे. मागील वर्षी रबीचे पीक ३५ हजार ४६९ क्षेत्रात घेण्यात आले होते. यंदा वातावरणातील बदल आणि कमी पाऊस यामुळे रबीच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे केवळ २८ हजार ९८७ क्षेत्रात रबी पीकाची लागवड होत आहे. यात धानासह भाजीपाला व इतर पिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात उन्हाळी भातपिकाचे सरासरी क्षेत्र सात हजार ९०० हेक्टर आहे. मागील वर्षी १८ हजार २८९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भात पीक घेण्यात आले. तर यावर्षी १६ हजार हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. सध्या जिल्ह्यात ३६५ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची रोपवाटिका लावण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यावर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उन्हाळी भात पिकाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सहा हजार ५०० हेक्टर क्षेत्रात प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये हेक्टरनिहाय क्षेत्र ठरविण्यात आले आहे. या अभियानातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घेता येईल व त्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.सर्वच पिकांच्या क्षेत्रात घटगेल्यावर्षीच्या गहू २६६८ हेक्टर, हरभरा ७८४१ हेक्टर, लाख, लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, पोपट आदी १३ हजार ७८० हेक्टर, जवस ८८१२ हेक्टरमध्ये तर मिरची, ऊस, भाजीपाला वगैरे पिके २३६८ हेक्टर क्षेत्रात घेण्यात आले होते. मात्र यावर्षी गहू १४३२ हेक्टर, मका १४३ हेक्टर, हरभरा ६४६६ हेक्टर, लाख-लाखोळी १० हजार २५९ हेक्टर, वाल, वटाणा, चवळी, पोपट व इतर १८३० हेक्टर, जवस ६०९५ हेक्टर क्षेत्रात असे एकूण २६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. याशिवाय ऊस ७८ हेक्टर, ऊस खोडवा ४०६ हेक्टर, भाजीपाला १५९६ हेक्टर, मिरची ५७२ हेक्टर, केळी १२ हेक्टर व टरबूज ७ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण २८ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रात सध्याचे रबी पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलने यंदा रबीचे क्षेत्र घटल्याचे तब्बल १८ टक्के पीक कमी होणार आहे.