शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रबीची लागवड १८ टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच

उन्हाळी भातपीक : जिल्ह्यात ३६५ हेक्टरवर रोपवाटिकादेवानंद शहारे - गोंदियाखरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रबीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घटणार आहे. मागील वर्षी रबीचे पीक ३५ हजार ४६९ क्षेत्रात घेण्यात आले होते. यंदा वातावरणातील बदल आणि कमी पाऊस यामुळे रबीच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे केवळ २८ हजार ९८७ क्षेत्रात रबी पीकाची लागवड होत आहे. यात धानासह भाजीपाला व इतर पिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात उन्हाळी भातपिकाचे सरासरी क्षेत्र सात हजार ९०० हेक्टर आहे. मागील वर्षी १८ हजार २८९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भात पीक घेण्यात आले. तर यावर्षी १६ हजार हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. सध्या जिल्ह्यात ३६५ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची रोपवाटिका लावण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यावर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उन्हाळी भात पिकाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सहा हजार ५०० हेक्टर क्षेत्रात प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये हेक्टरनिहाय क्षेत्र ठरविण्यात आले आहे. या अभियानातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घेता येईल व त्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.सर्वच पिकांच्या क्षेत्रात घटगेल्यावर्षीच्या गहू २६६८ हेक्टर, हरभरा ७८४१ हेक्टर, लाख, लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, पोपट आदी १३ हजार ७८० हेक्टर, जवस ८८१२ हेक्टरमध्ये तर मिरची, ऊस, भाजीपाला वगैरे पिके २३६८ हेक्टर क्षेत्रात घेण्यात आले होते. मात्र यावर्षी गहू १४३२ हेक्टर, मका १४३ हेक्टर, हरभरा ६४६६ हेक्टर, लाख-लाखोळी १० हजार २५९ हेक्टर, वाल, वटाणा, चवळी, पोपट व इतर १८३० हेक्टर, जवस ६०९५ हेक्टर क्षेत्रात असे एकूण २६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. याशिवाय ऊस ७८ हेक्टर, ऊस खोडवा ४०६ हेक्टर, भाजीपाला १५९६ हेक्टर, मिरची ५७२ हेक्टर, केळी १२ हेक्टर व टरबूज ७ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण २८ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रात सध्याचे रबी पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलने यंदा रबीचे क्षेत्र घटल्याचे तब्बल १८ टक्के पीक कमी होणार आहे.