शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रबीची लागवड १८ टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच

उन्हाळी भातपीक : जिल्ह्यात ३६५ हेक्टरवर रोपवाटिकादेवानंद शहारे - गोंदियाखरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रबीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घटणार आहे. मागील वर्षी रबीचे पीक ३५ हजार ४६९ क्षेत्रात घेण्यात आले होते. यंदा वातावरणातील बदल आणि कमी पाऊस यामुळे रबीच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे केवळ २८ हजार ९८७ क्षेत्रात रबी पीकाची लागवड होत आहे. यात धानासह भाजीपाला व इतर पिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात उन्हाळी भातपिकाचे सरासरी क्षेत्र सात हजार ९०० हेक्टर आहे. मागील वर्षी १८ हजार २८९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भात पीक घेण्यात आले. तर यावर्षी १६ हजार हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. सध्या जिल्ह्यात ३६५ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची रोपवाटिका लावण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यावर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उन्हाळी भात पिकाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सहा हजार ५०० हेक्टर क्षेत्रात प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये हेक्टरनिहाय क्षेत्र ठरविण्यात आले आहे. या अभियानातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घेता येईल व त्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.सर्वच पिकांच्या क्षेत्रात घटगेल्यावर्षीच्या गहू २६६८ हेक्टर, हरभरा ७८४१ हेक्टर, लाख, लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, पोपट आदी १३ हजार ७८० हेक्टर, जवस ८८१२ हेक्टरमध्ये तर मिरची, ऊस, भाजीपाला वगैरे पिके २३६८ हेक्टर क्षेत्रात घेण्यात आले होते. मात्र यावर्षी गहू १४३२ हेक्टर, मका १४३ हेक्टर, हरभरा ६४६६ हेक्टर, लाख-लाखोळी १० हजार २५९ हेक्टर, वाल, वटाणा, चवळी, पोपट व इतर १८३० हेक्टर, जवस ६०९५ हेक्टर क्षेत्रात असे एकूण २६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. याशिवाय ऊस ७८ हेक्टर, ऊस खोडवा ४०६ हेक्टर, भाजीपाला १५९६ हेक्टर, मिरची ५७२ हेक्टर, केळी १२ हेक्टर व टरबूज ७ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण २८ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रात सध्याचे रबी पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलने यंदा रबीचे क्षेत्र घटल्याचे तब्बल १८ टक्के पीक कमी होणार आहे.