शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

५२ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांचे नियोजन

By admin | Updated: October 30, 2014 22:54 IST

गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी

गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी पुरेशा पावसाअभावी पिकांची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नाही. धानपिकांच्या नुकसानीची कसर भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे. कृषी विभागाने या वर्षासाठी ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रबीच्या हंगामात १७ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पेरणी मात्र जवळपास एक टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी ३४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली होती. रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी शासनातर्फे अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात भर कशी पडेल? यासाठी प्रयत्न केले जातात.गहू पिकासाठी तीन हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. हरभरा पिकाच्या लागवडीसाठी नऊ हजार हेक्अर क्षेत्र, जवस पिकासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र, इतर पिकांसाठी १५ हजार हेक्टर क्षेत्र, भाजीपाला व इतर पिकांसाठी दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्र तर उन्हाळी भातपिकांसाठी १२ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील धानपिक उत्पादनात घट येणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकावर आपली गणिते मांडत आहेत. मात्र मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल घडून येत आहे. तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणातील बदलाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे धानकापणीला विलंब झाला. मात्र हलक्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लांबणीवर गेली आहे. यामुळे आतापर्यंत फक्त एक टक्क्यांपर्यंतच पेरणीचे काम पुर्ण झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी नियोजीत वेळेत झाल्यास उत्पादनात वाढ होते अशी शेतकऱ्यांची समज आहे. यामुळे पेरणी वेळेच्या आत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी जिल्हा कृषी विभागामार्फत देखील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर पुरविण्यात येणारे बियाणे अद्यापही पोचते करण्यात आले नाही.