शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

५२ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांचे नियोजन

By admin | Updated: October 30, 2014 22:54 IST

गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी

गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी धानाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी पुरेशा पावसाअभावी पिकांची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नाही. धानपिकांच्या नुकसानीची कसर भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे. कृषी विभागाने या वर्षासाठी ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रबीच्या हंगामात १७ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पेरणी मात्र जवळपास एक टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी ३४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली होती. रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी शासनातर्फे अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात भर कशी पडेल? यासाठी प्रयत्न केले जातात.गहू पिकासाठी तीन हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. हरभरा पिकाच्या लागवडीसाठी नऊ हजार हेक्अर क्षेत्र, जवस पिकासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र, इतर पिकांसाठी १५ हजार हेक्टर क्षेत्र, भाजीपाला व इतर पिकांसाठी दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्र तर उन्हाळी भातपिकांसाठी १२ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील धानपिक उत्पादनात घट येणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकावर आपली गणिते मांडत आहेत. मात्र मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल घडून येत आहे. तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणातील बदलाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे धानकापणीला विलंब झाला. मात्र हलक्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लांबणीवर गेली आहे. यामुळे आतापर्यंत फक्त एक टक्क्यांपर्यंतच पेरणीचे काम पुर्ण झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी नियोजीत वेळेत झाल्यास उत्पादनात वाढ होते अशी शेतकऱ्यांची समज आहे. यामुळे पेरणी वेळेच्या आत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी जिल्हा कृषी विभागामार्फत देखील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर पुरविण्यात येणारे बियाणे अद्यापही पोचते करण्यात आले नाही.