शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

घरकुल वाटपावरून सरपंच व सचिवांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  येथील  नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात  मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुलच्या प्रतीक्षा ड  यादीमध्ये गावातील अनेक कुटुंबांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी  प्रसिद्ध होताच यातील निम्मे नावे वगळण्यात आली. तेव्हा आमची नावे येथील सरपंच सचिवांनी वगळल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी वाद घातला. दरम्यान, यावरूनच सरपंच आणि सचिवाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी (दि.२) तालुुक्यातील चुलोद येथे घडला. दरम्यान वेळीच पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने वाद मिटला. २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  येथील  नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात  मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले. सरपंच, सचिव व संगणक परिचालक यांनी  कटकारस्थान रचून नागरिकांची नावे वगळल्याचा आरोप येथील नागरिकांनी करीत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. नागरिकांचा वाढता दबाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच यासंबंधाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा देण्यात आली.  पोलिसांनी त्वरित दखल घेत  परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा प्रत्यक्षात येथे उपस्थित होऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तूर्तास गावकरी शांत झाले.

यादीतील ४०० नावे नेमकी वगळली कुणी?- येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले. त्यामुळे यादीतील ४०० लाभार्थ्यांची नावे नेमकी कुणी वगळली असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

घरकुलाचा सर्व्हे हा पंचायत समिती  स्तरावरून करण्यात आला. त्यामुळे यात ग्रामपंचायत प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. तरी ज्या नागरिकांची नावे वगळण्यात आली  त्यांच्यासाठी लवकरच विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.- कार्तिक चव्हाण, ग्रामविकास अधिकारीप्रतीक्षारत ड यादीतील सर्वच कुटुंबांना शासनाने घरकुलाचा लाभ द्यावा. जेणेकरून गावात शांतता व सलोखा निर्माण राहील. ग्रामीण विकास यंत्रणेने पुनर्विचार करून आपली चूक तत्काळ दुरुस्त करावी.- लतीश बिसेन, सरपंच ग्रामपंचायत चुलोद

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाsarpanchसरपंच