शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

By admin | Updated: June 27, 2017 01:06 IST

गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

परिणय फुके : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यत गेल्या काही वर्षापासून उष्णतेत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवड करुन या उष्णतेला कमी करणे गरजेचे झाले आहे. मात्र वृक्ष लावनेच गरजेचे नसून त्यांचे संगोपन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. एक वृक्ष दिवसाला २१ हजार रुपये किंमतीच्या टँकची आॅक्सीजन देतो असे सिद्ध झाले आहे. पर्यावरणाची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अख्या महाराष्ट्रात २५ टक्के वनक्षेत्र असून त्याला ३३ टक्के करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट शासनाने ठरविले असून या वनापासून रोजगार निर्मिती करण्याचे शासनाने ठरविले आहे. पुढील काळात वन हे रोजगाराचे साधन असण्याचे शासनाचे प्रयत्न राहणार असे प्रतिपादन डॉ. परिणय फुके यांनी केले.१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम महाराष्ट्र शासनाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी वृक्षदिंडी काढण्यात येत आहे. याप्रसंगी गोंदिया वनविभागाद्वारे स्थनिक जयस्तंभ चौकात ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभ व वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल सोले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, बबलू मेश्राम, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार फुके यांनी, वनक्षेत्रात वाढ झाल्यास त्याचे अनेक फायदे भविष्यात दिसून येणार. आतापर्यंतच्या शासनाच्या धोरणात इंडस्ट्री आणून रोजगाराचे स्वप्न दाखविले जात होते. मात्र यात अपयशच आले आहे. करिता शासनाने जंगलक्षेत्रात वाढ करुन यापासून रोजगार निर्मिती करण्याची मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे. जंगलापासून जास्त लोकांना रोजगार मिळू शकतो आणि यात खर्चही इंडस्ट्री उभारण्याच्या तुलनेत कमी येणार आहे. याकरिता लोकांना प्रशिक्षण देवून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. लोक इंडस्ट्री पाहून आनंदी होत नाही मात्र जंगलाला पाहून आनंदी होतात याकरिता पुढे जंगलात रोजगार निर्मितीचे शासनाने ठरविले असल्यचेही सांगीतले.