शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:39 IST

यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनची १० लाख क्विंटल: धान खरेदीत आणखी भर पडणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ अशी ख्याती आहे. कारण जिल्हयात धान पीक हेच प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचीच शेती करीत असून सर्वाधीक धानाचेच उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र आजही बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर आपली शेती फुलवित आहे. यामुळे निसर्गाच्या मर्जीवरच जिल्ह्यातील शेती फुलत असल्याची येथील वास्तवीकता आहे. हेच कारण आहे की, मागील काही वर्षांपासन पावसाच्या लहरीपणामुळे धानाचे उत्पादन झाले नाही व शेतकरी अडचणीत आला होता.यंदा मात्र सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिली व शेतकरी धान पीक घेवू शकला. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस मिळाल्यामुळे जिल्ह्यात यंदा भरभरून धानाचे उत्पादन झाल्याचे दिसून येत आहे.हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.यात मार्के टींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.मार्च पर्यंत होणार धान खरेदीजिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन ५७ केंद्रांच्या माध्यमातून तर आदिवासी विकास महामंडळ ४३ केद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करते. अशात आतापर्यंत दोघांनी मिळून १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची ही आकडेवारी आणखीही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत भक्कम धान खरेदी होणार असल्याचे दिसत आहे.भाव वाढीच्या आशेने विक्री थांबलीशेजारच्या मध्यप्रदेश राज्यात कॉँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी धानाला २५०० हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आपल्या राज्यातील विरोधी पक्षातील नेतेही धानाला २५०० रूपये भाव द्यावा ही मागणी रेटून धरत आहे. अशात राज्यातही धानाला २५०० भाव जाहीर झाल्यास आताच विक्री करून नुकसानीत जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी धान विक्री थांबविल्याचे बोलले जात आहे. मात्र मार्च पर्यंत केंद्र सुरू राहणार असल्याने नक्कीच धान खरेदीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Marketबाजार