शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:39 IST

यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनची १० लाख क्विंटल: धान खरेदीत आणखी भर पडणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ अशी ख्याती आहे. कारण जिल्हयात धान पीक हेच प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचीच शेती करीत असून सर्वाधीक धानाचेच उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र आजही बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर आपली शेती फुलवित आहे. यामुळे निसर्गाच्या मर्जीवरच जिल्ह्यातील शेती फुलत असल्याची येथील वास्तवीकता आहे. हेच कारण आहे की, मागील काही वर्षांपासन पावसाच्या लहरीपणामुळे धानाचे उत्पादन झाले नाही व शेतकरी अडचणीत आला होता.यंदा मात्र सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिली व शेतकरी धान पीक घेवू शकला. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस मिळाल्यामुळे जिल्ह्यात यंदा भरभरून धानाचे उत्पादन झाल्याचे दिसून येत आहे.हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.यात मार्के टींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.मार्च पर्यंत होणार धान खरेदीजिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन ५७ केंद्रांच्या माध्यमातून तर आदिवासी विकास महामंडळ ४३ केद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करते. अशात आतापर्यंत दोघांनी मिळून १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची ही आकडेवारी आणखीही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत भक्कम धान खरेदी होणार असल्याचे दिसत आहे.भाव वाढीच्या आशेने विक्री थांबलीशेजारच्या मध्यप्रदेश राज्यात कॉँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी धानाला २५०० हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आपल्या राज्यातील विरोधी पक्षातील नेतेही धानाला २५०० रूपये भाव द्यावा ही मागणी रेटून धरत आहे. अशात राज्यातही धानाला २५०० भाव जाहीर झाल्यास आताच विक्री करून नुकसानीत जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी धान विक्री थांबविल्याचे बोलले जात आहे. मात्र मार्च पर्यंत केंद्र सुरू राहणार असल्याने नक्कीच धान खरेदीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Marketबाजार