शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:39 IST

यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनची १० लाख क्विंटल: धान खरेदीत आणखी भर पडणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ अशी ख्याती आहे. कारण जिल्हयात धान पीक हेच प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचीच शेती करीत असून सर्वाधीक धानाचेच उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र आजही बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर आपली शेती फुलवित आहे. यामुळे निसर्गाच्या मर्जीवरच जिल्ह्यातील शेती फुलत असल्याची येथील वास्तवीकता आहे. हेच कारण आहे की, मागील काही वर्षांपासन पावसाच्या लहरीपणामुळे धानाचे उत्पादन झाले नाही व शेतकरी अडचणीत आला होता.यंदा मात्र सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिली व शेतकरी धान पीक घेवू शकला. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस मिळाल्यामुळे जिल्ह्यात यंदा भरभरून धानाचे उत्पादन झाल्याचे दिसून येत आहे.हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.यात मार्के टींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.मार्च पर्यंत होणार धान खरेदीजिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन ५७ केंद्रांच्या माध्यमातून तर आदिवासी विकास महामंडळ ४३ केद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करते. अशात आतापर्यंत दोघांनी मिळून १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची ही आकडेवारी आणखीही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत भक्कम धान खरेदी होणार असल्याचे दिसत आहे.भाव वाढीच्या आशेने विक्री थांबलीशेजारच्या मध्यप्रदेश राज्यात कॉँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी धानाला २५०० हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आपल्या राज्यातील विरोधी पक्षातील नेतेही धानाला २५०० रूपये भाव द्यावा ही मागणी रेटून धरत आहे. अशात राज्यातही धानाला २५०० भाव जाहीर झाल्यास आताच विक्री करून नुकसानीत जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी धान विक्री थांबविल्याचे बोलले जात आहे. मात्र मार्च पर्यंत केंद्र सुरू राहणार असल्याने नक्कीच धान खरेदीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Marketबाजार