शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 

ठळक मुद्देरस्ता बांधकामाची मुदत संपूनही काम अपूर्ण : पोलिस तक्रारीला देखील दाखविली केराची टोपली

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी ते शेंडा या रस्ता बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सला दिले आहे. या बांधकामाची मुदत संपूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याची सडक अर्जुनी येथील नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. पण त्या तक्रारीला सुध्दा केराची टोपली दाखविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या दबाबवाखाली येऊन या बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहे. अताशा आशिर्वाद बिल्डर्सला सडक अर्जुनी ते शेंडा या रस्त्याचे आणि सडक अर्जुनी ते केसलवाडा या १ किमीच्या नाली बांधकामाचे कंत्राट १२ नोव्हेंबर २०१८ रोजी देण्यात आले. नाली आणि रस्ताचे काम १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. एकूण २२ काेटी रुपयांचे हे काम आहे. यात २ किमी सिमेंट रस्ता आणि रस्त्याच्या बाजुला क्रॉंक्रीटच्या नाल्या तयार करायच्या आहेत.  दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अर्धे सुध्दा काम पूर्ण करण्यात आले नाही.कंत्राटदाराकडून कधी मुरुम नसल्याचा तर कधी यंत्रसामुग्री नसल्याचे सांगत वेळ मारुन नेणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सडक अर्जुनी ते केसलवाडा मार्गावर मागील वर्षभरापासून नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. मुदतीत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारावर नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सडक अर्जुनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर कंत्राटदाराला साधी नोटीस सुध्दा बजाविण्याचे धाडस या विभागाने केले नाही, त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली कसे काम करीत आहे दिसून येते.मुदतवाढ देण्यासाठी पत्र रस्ता आणि नालीचे बांधकाम अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. त्यानंतर आता पुन्हा काम पूर्ण करण्यासाठी  बिल्डर्सने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केल्याची माहिती आहे.कंत्राटदाला वरदहस्त कुणाचानागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अर्धे देखील काम पूर्ण केले नाही. तर यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा कंत्राटदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. आशिर्वाद बिल्डर्सला बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वांरवार देण्यात आल्या आहे. आता काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने मुदतवाढीचे पत्र दिले आहे. येत्या चार पाच दिवसात कामाला सुरुवात केली जाणार आहे. - प्रकाश लांजेवार, उपविभागीय अभियंता सडक अर्जुनी

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग