शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 

ठळक मुद्देरस्ता बांधकामाची मुदत संपूनही काम अपूर्ण : पोलिस तक्रारीला देखील दाखविली केराची टोपली

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी ते शेंडा या रस्ता बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सला दिले आहे. या बांधकामाची मुदत संपूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याची सडक अर्जुनी येथील नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. पण त्या तक्रारीला सुध्दा केराची टोपली दाखविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या दबाबवाखाली येऊन या बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहे. अताशा आशिर्वाद बिल्डर्सला सडक अर्जुनी ते शेंडा या रस्त्याचे आणि सडक अर्जुनी ते केसलवाडा या १ किमीच्या नाली बांधकामाचे कंत्राट १२ नोव्हेंबर २०१८ रोजी देण्यात आले. नाली आणि रस्ताचे काम १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. एकूण २२ काेटी रुपयांचे हे काम आहे. यात २ किमी सिमेंट रस्ता आणि रस्त्याच्या बाजुला क्रॉंक्रीटच्या नाल्या तयार करायच्या आहेत.  दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अर्धे सुध्दा काम पूर्ण करण्यात आले नाही.कंत्राटदाराकडून कधी मुरुम नसल्याचा तर कधी यंत्रसामुग्री नसल्याचे सांगत वेळ मारुन नेणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सडक अर्जुनी ते केसलवाडा मार्गावर मागील वर्षभरापासून नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. मुदतीत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारावर नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सडक अर्जुनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर कंत्राटदाराला साधी नोटीस सुध्दा बजाविण्याचे धाडस या विभागाने केले नाही, त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली कसे काम करीत आहे दिसून येते.मुदतवाढ देण्यासाठी पत्र रस्ता आणि नालीचे बांधकाम अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. त्यानंतर आता पुन्हा काम पूर्ण करण्यासाठी  बिल्डर्सने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केल्याची माहिती आहे.कंत्राटदाला वरदहस्त कुणाचानागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अर्धे देखील काम पूर्ण केले नाही. तर यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा कंत्राटदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. आशिर्वाद बिल्डर्सला बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वांरवार देण्यात आल्या आहे. आता काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने मुदतवाढीचे पत्र दिले आहे. येत्या चार पाच दिवसात कामाला सुरुवात केली जाणार आहे. - प्रकाश लांजेवार, उपविभागीय अभियंता सडक अर्जुनी

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग