शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 

ठळक मुद्देरस्ता बांधकामाची मुदत संपूनही काम अपूर्ण : पोलिस तक्रारीला देखील दाखविली केराची टोपली

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी ते शेंडा या रस्ता बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सला दिले आहे. या बांधकामाची मुदत संपूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याची सडक अर्जुनी येथील नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. पण त्या तक्रारीला सुध्दा केराची टोपली दाखविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या दबाबवाखाली येऊन या बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहे. अताशा आशिर्वाद बिल्डर्सला सडक अर्जुनी ते शेंडा या रस्त्याचे आणि सडक अर्जुनी ते केसलवाडा या १ किमीच्या नाली बांधकामाचे कंत्राट १२ नोव्हेंबर २०१८ रोजी देण्यात आले. नाली आणि रस्ताचे काम १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. एकूण २२ काेटी रुपयांचे हे काम आहे. यात २ किमी सिमेंट रस्ता आणि रस्त्याच्या बाजुला क्रॉंक्रीटच्या नाल्या तयार करायच्या आहेत.  दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अर्धे सुध्दा काम पूर्ण करण्यात आले नाही.कंत्राटदाराकडून कधी मुरुम नसल्याचा तर कधी यंत्रसामुग्री नसल्याचे सांगत वेळ मारुन नेणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सडक अर्जुनी ते केसलवाडा मार्गावर मागील वर्षभरापासून नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. मुदतीत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारावर नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सडक अर्जुनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर कंत्राटदाराला साधी नोटीस सुध्दा बजाविण्याचे धाडस या विभागाने केले नाही, त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली कसे काम करीत आहे दिसून येते.मुदतवाढ देण्यासाठी पत्र रस्ता आणि नालीचे बांधकाम अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. त्यानंतर आता पुन्हा काम पूर्ण करण्यासाठी  बिल्डर्सने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केल्याची माहिती आहे.कंत्राटदाला वरदहस्त कुणाचानागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अर्धे देखील काम पूर्ण केले नाही. तर यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा कंत्राटदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. आशिर्वाद बिल्डर्सला बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वांरवार देण्यात आल्या आहे. आता काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने मुदतवाढीचे पत्र दिले आहे. येत्या चार पाच दिवसात कामाला सुरुवात केली जाणार आहे. - प्रकाश लांजेवार, उपविभागीय अभियंता सडक अर्जुनी

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग