शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उमेद प्रकल्पात महिलांचा मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बचत गटांचे काम सुरू झाले. २६ जुलै २०१६ रोजी शासनाने एक आदेश काढले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या २५ लाखांवर झालेल्या खर्चाला जबाबदार कोण

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध संघाच्या महिलांचा मानसिक छळ केला जात आहे. महिलांनी तक्र ार केली म्हणून सूड उगविण्यासाठी त्यांना कामावरून कमी करण्याचे षड्यंत्र जिल्हा व्यवस्थापक रचत असल्याची तक्र ार करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बचत गटांचे काम सुरू झाले. २६ जुलै २०१६ रोजी शासनाने एक आदेश काढले.त्या आदेशानुसार ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले असल्यास शहर क्षेत्रात नगरपंचायतच्या अधिपत्याखाली गट तयार करण्यात यावे अशा सूचना होत्या. येथे १२ फेब्रुवारी २०१५ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यावेळी अर्जुनी गावात तीन ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २१ आॅक्टो २०१६ रोजी उज्वला महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. जर नगरपंचायत स्थापनेनंतर हे प्रभागसंघ व तत्पूर्वी तीन ग्रामसंघ अस्तित्वात आले तर त्याचवेळी हे संघ नगरपंचायतला हस्तांतरीत का करण्यात आले नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.अर्जुनी-मोरगाव हा अभियानाचा भाग नाही त्यामुळे अर्जुनी मध्ये समाविष्ट असणाऱ्या कॅडरला सन २०१६ च्या शासन पत्रानुसार कामावरून कमी करण्यात येत असल्याचे भ्रमणध्वनी संदेश १४ आॅगस्ट रोजी आले. तत्पूर्वी जिल्हा अभियान व्यवस्थापनाचे व स्थानिक एक कर्मचारी महिलांना धाक दाखवून कोºया कागदावर सह्या घेणे, अपशब्दात बोलणे, महिलांचे हात पकडणे, महिलांची बदनामी करणे, रात्री-अपरात्री दारू पिऊन महिलांना फोन करणे, ग्रामसंघाला कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री उशिरापर्यंत भेट देणे या पद्धतीचे कृत्य करीत होते. या कृत्यांची वरिष्ठांना तक्र ार केली असता त्याचा सूड उगवण्यासाठी या महिलांना कामावरून कमी करण्याचा षडयंत्र त्यांनी रचला.उज्वल प्रभागसंघ माहुरकुडा येथील दस्तावेज, साहित्य तालुका अभियान व्यवस्थापन कक्षात जमा करावा अन्यथा पंचनामा करण्यात येईल असे पत्र काढले. त्यामुळे या उपक्र मांतर्गत काम करणाºया महिलावर्गात भीती निर्माण झाली आहे. कर्ज देऊन महिलांना समृद्ध करणारी यंत्रणाच महिलांवर बेरोजगारीचे संकट ओढवत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? हा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे . अन्यायाविरुद्ध दाद मागणे या महिलांना महागात पडणार काय हा प्रश्न कायम आहे.या खर्चाला जबाबदार कोण?नगरपंचायत अस्तित्वात असताना या जिल्हास्तरीय यंत्रणेने प्रभागस्तरीय गट निर्मितीची परवानगी दिली. वेळीच नगरपंचायतकडे त्यांचे हस्तांतरण केले असते तर त्यांच्या मानधनापोटी ३ वर्षांत झालेला २१ लाखांवरचा खर्च नगरपंचायतने केला असता. मात्र या खर्चाचा नाहक भुर्दंड जिल्हा परिषदेला करावा लागला. या खर्चासाठी जबाबदार कोण? हा खर्च जिल्हा अभियान व्यवस्थापकाकडून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.पंचायत समितीने घेतला ठरावया अभियानांतर्गत कार्यरत महिलांनी २६ जुलै रोजी तक्र ार केली. या तक्र ारीच्या अनुषंगाने १३ आॅगस्ट रोजी पंचायत समितीच्या नियंत्रक समितीची सभापती अरविंद शिवणकर यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. सभेत महिला व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. जबाबदार अधिकारी म्हणून महिलांना देण्यात येणारी वागणूक योग्य नाही त्यांना तात्काळ कामावरून काढण्यात यावे, नागरपंचायत येथे एनयुएलएम प्रक्रिया सुरू होणे व जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर हस्तांतरण प्रक्रि या पार पडेपर्यंत अस्तित्वात असलेले गट, प्रभाग व कॅडर सुरू ठेवावेत असा ठराव पारित करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक