शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

उमेद प्रकल्पात महिलांचा मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बचत गटांचे काम सुरू झाले. २६ जुलै २०१६ रोजी शासनाने एक आदेश काढले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या २५ लाखांवर झालेल्या खर्चाला जबाबदार कोण

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध संघाच्या महिलांचा मानसिक छळ केला जात आहे. महिलांनी तक्र ार केली म्हणून सूड उगविण्यासाठी त्यांना कामावरून कमी करण्याचे षड्यंत्र जिल्हा व्यवस्थापक रचत असल्याची तक्र ार करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बचत गटांचे काम सुरू झाले. २६ जुलै २०१६ रोजी शासनाने एक आदेश काढले.त्या आदेशानुसार ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले असल्यास शहर क्षेत्रात नगरपंचायतच्या अधिपत्याखाली गट तयार करण्यात यावे अशा सूचना होत्या. येथे १२ फेब्रुवारी २०१५ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यावेळी अर्जुनी गावात तीन ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २१ आॅक्टो २०१६ रोजी उज्वला महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. जर नगरपंचायत स्थापनेनंतर हे प्रभागसंघ व तत्पूर्वी तीन ग्रामसंघ अस्तित्वात आले तर त्याचवेळी हे संघ नगरपंचायतला हस्तांतरीत का करण्यात आले नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.अर्जुनी-मोरगाव हा अभियानाचा भाग नाही त्यामुळे अर्जुनी मध्ये समाविष्ट असणाऱ्या कॅडरला सन २०१६ च्या शासन पत्रानुसार कामावरून कमी करण्यात येत असल्याचे भ्रमणध्वनी संदेश १४ आॅगस्ट रोजी आले. तत्पूर्वी जिल्हा अभियान व्यवस्थापनाचे व स्थानिक एक कर्मचारी महिलांना धाक दाखवून कोºया कागदावर सह्या घेणे, अपशब्दात बोलणे, महिलांचे हात पकडणे, महिलांची बदनामी करणे, रात्री-अपरात्री दारू पिऊन महिलांना फोन करणे, ग्रामसंघाला कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री उशिरापर्यंत भेट देणे या पद्धतीचे कृत्य करीत होते. या कृत्यांची वरिष्ठांना तक्र ार केली असता त्याचा सूड उगवण्यासाठी या महिलांना कामावरून कमी करण्याचा षडयंत्र त्यांनी रचला.उज्वल प्रभागसंघ माहुरकुडा येथील दस्तावेज, साहित्य तालुका अभियान व्यवस्थापन कक्षात जमा करावा अन्यथा पंचनामा करण्यात येईल असे पत्र काढले. त्यामुळे या उपक्र मांतर्गत काम करणाºया महिलावर्गात भीती निर्माण झाली आहे. कर्ज देऊन महिलांना समृद्ध करणारी यंत्रणाच महिलांवर बेरोजगारीचे संकट ओढवत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? हा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे . अन्यायाविरुद्ध दाद मागणे या महिलांना महागात पडणार काय हा प्रश्न कायम आहे.या खर्चाला जबाबदार कोण?नगरपंचायत अस्तित्वात असताना या जिल्हास्तरीय यंत्रणेने प्रभागस्तरीय गट निर्मितीची परवानगी दिली. वेळीच नगरपंचायतकडे त्यांचे हस्तांतरण केले असते तर त्यांच्या मानधनापोटी ३ वर्षांत झालेला २१ लाखांवरचा खर्च नगरपंचायतने केला असता. मात्र या खर्चाचा नाहक भुर्दंड जिल्हा परिषदेला करावा लागला. या खर्चासाठी जबाबदार कोण? हा खर्च जिल्हा अभियान व्यवस्थापकाकडून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.पंचायत समितीने घेतला ठरावया अभियानांतर्गत कार्यरत महिलांनी २६ जुलै रोजी तक्र ार केली. या तक्र ारीच्या अनुषंगाने १३ आॅगस्ट रोजी पंचायत समितीच्या नियंत्रक समितीची सभापती अरविंद शिवणकर यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. सभेत महिला व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. जबाबदार अधिकारी म्हणून महिलांना देण्यात येणारी वागणूक योग्य नाही त्यांना तात्काळ कामावरून काढण्यात यावे, नागरपंचायत येथे एनयुएलएम प्रक्रिया सुरू होणे व जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर हस्तांतरण प्रक्रि या पार पडेपर्यंत अस्तित्वात असलेले गट, प्रभाग व कॅडर सुरू ठेवावेत असा ठराव पारित करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक