शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

२४ तास अखंड वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

साखरीटोला : परिसरात वेळीअवे‌ळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून ...

साखरीटोला : परिसरात वेळीअवे‌ळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून शेतकऱ्यांना फक्त ८ तासांकरिता वीजपुरवठा करणार असल्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार असून २४ तास अखंड वीजपुरवठा करा अशी मागणी वीजग्राहक व शेतकऱ्यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

साखरीटोला येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र असून त्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना दररोज सकाळी ९.३० वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत म्हणजे फक्त ८ तास वीजपुरवठा होणार आहे. पॉवरहाऊसमधून ऑटोमेटिक पद्धतीने तशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच हा प्रकार शेतकऱ्यांचा घात करणारा आहे. भाजप शासन काळात लोडशेडिंग या ‘शब्दा’लाच अंतिम विराम लागले होता. त्याकाळात थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. तर त्यावर तोडगा काढून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा घात केला असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत. ८ तास वीजपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणीही देता येणार नाही. त्यात ग्रामीण परिसरात वीजदाब अत्यंत कमी राहतो. सततची नापिकी व लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता खरीप हंगामाची सुरुवात होताच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी व वीजग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. अशात राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी याकड़े लक्ष देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गाने पुढे जाणार, अशी इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

------------

मागणीच्या तुलनेच उत्पादन कमी

मागणीनुसार विजेचे उत्पादन कमी असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याना ८ तास वीजपुरवठा होणार आहे. असे ऑटोमेटिक शेड्यूल तयार करण्यात आले असल्याचे शाखा अभियंता पाटील यांनी सांगीतले. त्यामुळे शासननिर्णयाची अंमलबजावणी होणार असून याचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.