शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे.

ठळक मुद्देशासनाचे आदेश धडकले : सर्व बँकांना काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्याची अडचण जात होती. हीच बाब ओळखून शासनाने सर्व जिल्हा आणि व्यापारी बँकाना कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे निर्देश शासनाने सर्व व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा बँकाना दिले आहे. तसे आदेश सुध्दा सर्व बँकामध्ये धडकले आहे.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे. हे सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते निरंक न झाल्याने त्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्याची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील अडचणीत आला होता. शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. तर मागील तीन महिन्यापासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन होते.त्यामुळे शासनाच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी शासनाने विविध खर्चाला कात्री लावली आहे. तसेच विविध शासकीय विभागांना सुध्दा खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडे सध्या निधीचा अभाव असल्याने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून त्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेला एकही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण आणि व्यापारी बँकाना दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुध्दा जिल्ह्यातील सर्व बँकांना या संबंधिचे निर्देश दिले आहे.शासन देणार बँकांना व्याजाची रक्कममहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणे बाकी आहे. मात्र यामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच जोपर्यंत ही रक्कम शासनाकडून बँकाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत या रक्कमेवरील व्याज शासन देणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज