शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे.

ठळक मुद्देशासनाचे आदेश धडकले : सर्व बँकांना काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्याची अडचण जात होती. हीच बाब ओळखून शासनाने सर्व जिल्हा आणि व्यापारी बँकाना कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे निर्देश शासनाने सर्व व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा बँकाना दिले आहे. तसे आदेश सुध्दा सर्व बँकामध्ये धडकले आहे.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे. हे सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते निरंक न झाल्याने त्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्याची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील अडचणीत आला होता. शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. तर मागील तीन महिन्यापासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन होते.त्यामुळे शासनाच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी शासनाने विविध खर्चाला कात्री लावली आहे. तसेच विविध शासकीय विभागांना सुध्दा खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडे सध्या निधीचा अभाव असल्याने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून त्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेला एकही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण आणि व्यापारी बँकाना दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुध्दा जिल्ह्यातील सर्व बँकांना या संबंधिचे निर्देश दिले आहे.शासन देणार बँकांना व्याजाची रक्कममहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणे बाकी आहे. मात्र यामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच जोपर्यंत ही रक्कम शासनाकडून बँकाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत या रक्कमेवरील व्याज शासन देणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज