शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पंचशील ध्वजारोहणासाठी विरोध

By admin | Updated: May 23, 2016 01:52 IST

महालगाव येथे बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणप्रसंगी वादग्रस्त जागेवर ध्वजारोहण करू नये, अशी भूमिका घेऊन महिलांनी ठिय्या मांडल्याने ध्वजारोहण होऊ शकले नाही.

अर्जुनी-मोरगाव : महालगाव येथे बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणप्रसंगी वादग्रस्त जागेवर ध्वजारोहण करू नये, अशी भूमिका घेऊन महिलांनी ठिय्या मांडल्याने ध्वजारोहण होऊ शकले नाही. पोलिसांनी या वेळी चोख बंदोबस्त पाळला. महालगाव येथील समाज मंदिराला लागून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. हा वाद गेल्या सहा महिन्यांपाूसन सुरू आहे. या जागेवर ध्वजारोहण करण्याची परवानगी भाऊराव खोब्रागडे व सहकाऱ्यांनी तालुका प्रशासनाकडे मागितली. या जागेच्या व्यतिरिक्त कार्यक्रम पार पाडण्याची परवानगी दिली. बऱ्याच महिन्यांपासून वाद सुरू आहे. आमच्याकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देत नाही, असे सांगून कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी दुसऱ्या गटाने भूमिका घेतली. शनिवारी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार होते, मात्र सकाळी ८ वाजताच सुमारे ५० महिला-पुरुषांनी रस्त्याच्या कडेला ठिय्या मांडला व ध्वजारोहण होणार नाही, असे फर्मान सोडले. प्रशासनाने दोन्ही पक्षांना १४९ अन्वये नोटीस बजावली होती. अशी आक्रमक भूमिका बघून खोब्रागडे यांनी तहसीलदारांशी बोलणी केली व कार्यक्रम घरीच करु, वादग्रस्त जागेवर करणार नाहीे, असे सांगितल्याने हे प्रकरण येथेच निवडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त पाळला होता. अखेर दुपारी बंदोबस्त काढून घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)वाद वाढविण्याचा हेतू नाही-खोब्रागडे बौध्दपौर्णिमेला ध्वजारोहण व्हावे यासाठी आम्ही एकत्र झालो. त्याठिकाणी ध्वजारोहण होऊ दिले नाही. आम्हाला वाद चिघळवायचा नाही. आम्ही समाजबांधवांनी घरीच कार्यक्रम पार पाडले. सामंजस्याची भूमिका घेतली. गावात शांतता नांदली पाहिजे. हा वाद निवळल्यानंतर आम्हाला एकमेकांच्या सहकार्याने याच गावात राहून एकमेकांच्या घरचे कार्यक्रम पार पाडायचे आहेत, असे विचार माजी जि.प. सदस्य भाऊराव खोब्रागडे व रामटेके यांनी व्यक्त केले.अद्याप न्याय मिळाला नाही गेल्या सहा महिन्यांपासून समाजमंदिराला लागून मूर्त्यांची अनधिकृत स्थापना करण्याचा वाद महालगाव येथे सुरु आहे. न्याय मिळण्यासाठी गेल्या ३० मार्चपासून तहसील कार्यालय प्रांगणात आमची काही लोक उपोषणाला बसली आहेत. कोणतेही वरिष्ठ अधिकारी आम्हाला न्याय देत नाही. या वादग्रस्त जागेचा न्याय निवाडा त्वरित करावा. जोपर्यंत हा वाद सुरू आहे, तोपर्यंत या जागेवर अशी परवानगी देऊ नये, अद्याप वाद संपलेला नाही, असे मत योगेश मारगाये यांनी व्यक्त केले.