शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

शेतकऱ्यांवरील लाठी हल्ल्याचा केला निषेध ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शांतताप्रिय आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम पोलीस ...

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शांतताप्रिय आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम पोलीस करीत आहेत. नुकताच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेचा राज्य किसान सभेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिकारी सिन्हा यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले आहे.

केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. ते कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी दिल्ली राज्यासह अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. २८ ऑगस्ट रोजी हरियाणा राज्यातील करनाल शहरात शेतकऱ्यांनी केलेल्या शांतीपूर्ण रस्ता रोको आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांना पोलिसांनी लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. हा अमानुष हल्ला असून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिकारी यांच्यावर बडतर्फ कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ते तीन कायदे मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा किसान सभेच्या वतीने देण्यात आले. यावेळी हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, प्रल्हाद उके, घनश्याम गजभिये, दिनेश रामटेके व शेतकरी उपस्थित होते.