शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा

By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST

जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे.

ुउपवनसंरक्षक रामगावकर : ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन गोंदिया: जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे. वनाची सीमा दूरवर पसरलेली असल्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्य तत्परतेने काम करीत आहे. वनसंपदेचे रक्षण करणे आणि वनाला आगीपासून वाचविणे हे आज प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. वन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला ग्रामीण वनलगतच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीशिवाय वनसंपदेचे संरक्षण व वनाचे आगीपासून रक्षण करणे कठिण काम आहे.दरवर्षी १५ फेब्रूवारी ते १५ जून या कालावधीतील भीषण उन्हाळ्यात वनात आग लागण्याच्या थटना घडत असतात. या आगीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वनसंपदा जळून नष्ट होते. वन्यजीव होरपळून मरतात. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भुभागावर कायमस्वरुपी दुष्टपरिणाम टाळण्याकरिता या वर्षात वनात कमीत कमी आगीच्या घटना घडाव्यात यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सज्ज आहे. वनात लागणाऱ्या आगीच्या घटनेची सुचना जवळच्या परिक्षेत्र किंवा उपक्षेत्र कार्यालयाला त्वरीत ग्रामस्थांनी दयावी. वनात अग्नीजन्य साहित्य घेऊन वावरु नये, वनक्षेत्रात आग लावणे, अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक वा वन्यजीवाची शिकार करणे याकरिता जर कुणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास त्याबाबत वन विभागास गुप्त माहिती पुरविण्यात यावी. माहिती पुरविणाऱ्यांचे नाव गुप्त राखण्यात येईल व यथायोग्य बक्षीस सुद्धा देण्यात येईल. वनसंपदेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे व त्याकरिता वनलगतच्या ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी वन विभागाला स्वयंस्फुर्तीने बहुमूल्य सहकार्य करावे असे आवाहन, वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.