शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा

By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST

जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे.

ुउपवनसंरक्षक रामगावकर : ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन गोंदिया: जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे. वनाची सीमा दूरवर पसरलेली असल्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्य तत्परतेने काम करीत आहे. वनसंपदेचे रक्षण करणे आणि वनाला आगीपासून वाचविणे हे आज प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. वन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला ग्रामीण वनलगतच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीशिवाय वनसंपदेचे संरक्षण व वनाचे आगीपासून रक्षण करणे कठिण काम आहे.दरवर्षी १५ फेब्रूवारी ते १५ जून या कालावधीतील भीषण उन्हाळ्यात वनात आग लागण्याच्या थटना घडत असतात. या आगीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वनसंपदा जळून नष्ट होते. वन्यजीव होरपळून मरतात. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भुभागावर कायमस्वरुपी दुष्टपरिणाम टाळण्याकरिता या वर्षात वनात कमीत कमी आगीच्या घटना घडाव्यात यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सज्ज आहे. वनात लागणाऱ्या आगीच्या घटनेची सुचना जवळच्या परिक्षेत्र किंवा उपक्षेत्र कार्यालयाला त्वरीत ग्रामस्थांनी दयावी. वनात अग्नीजन्य साहित्य घेऊन वावरु नये, वनक्षेत्रात आग लावणे, अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक वा वन्यजीवाची शिकार करणे याकरिता जर कुणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास त्याबाबत वन विभागास गुप्त माहिती पुरविण्यात यावी. माहिती पुरविणाऱ्यांचे नाव गुप्त राखण्यात येईल व यथायोग्य बक्षीस सुद्धा देण्यात येईल. वनसंपदेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे व त्याकरिता वनलगतच्या ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी वन विभागाला स्वयंस्फुर्तीने बहुमूल्य सहकार्य करावे असे आवाहन, वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.