शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा

By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST

जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे.

ुउपवनसंरक्षक रामगावकर : ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन गोंदिया: जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे. वनाची सीमा दूरवर पसरलेली असल्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्य तत्परतेने काम करीत आहे. वनसंपदेचे रक्षण करणे आणि वनाला आगीपासून वाचविणे हे आज प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. वन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला ग्रामीण वनलगतच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीशिवाय वनसंपदेचे संरक्षण व वनाचे आगीपासून रक्षण करणे कठिण काम आहे.दरवर्षी १५ फेब्रूवारी ते १५ जून या कालावधीतील भीषण उन्हाळ्यात वनात आग लागण्याच्या थटना घडत असतात. या आगीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वनसंपदा जळून नष्ट होते. वन्यजीव होरपळून मरतात. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भुभागावर कायमस्वरुपी दुष्टपरिणाम टाळण्याकरिता या वर्षात वनात कमीत कमी आगीच्या घटना घडाव्यात यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सज्ज आहे. वनात लागणाऱ्या आगीच्या घटनेची सुचना जवळच्या परिक्षेत्र किंवा उपक्षेत्र कार्यालयाला त्वरीत ग्रामस्थांनी दयावी. वनात अग्नीजन्य साहित्य घेऊन वावरु नये, वनक्षेत्रात आग लावणे, अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक वा वन्यजीवाची शिकार करणे याकरिता जर कुणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास त्याबाबत वन विभागास गुप्त माहिती पुरविण्यात यावी. माहिती पुरविणाऱ्यांचे नाव गुप्त राखण्यात येईल व यथायोग्य बक्षीस सुद्धा देण्यात येईल. वनसंपदेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे व त्याकरिता वनलगतच्या ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी वन विभागाला स्वयंस्फुर्तीने बहुमूल्य सहकार्य करावे असे आवाहन, वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.