शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे प्रस्तावित क्षेत्र ५१.५० हजार हेक्टर

By admin | Updated: October 24, 2015 01:48 IST

सध्या खरिपाचे पीक निघायचे आहे. हलक्या धानाची कापणी सुरू झाली असून भारी धान कापणीला तयार होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

गोंदिया : सध्या खरिपाचे पीक निघायचे आहे. हलक्या धानाची कापणी सुरू झाली असून भारी धान कापणीला तयार होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून रबी हंगामासाठी तयारी सुरू होणार असल्यामुळे कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षी रबीच्या पिकांसाठी एकूण ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.सद्यस्थितीत खरीप हंगामाच्या हलक्या धान पिकांची कापणी केवळ १० टक्केच झाली आहे. ही धान कापणी पूर्ण होताच भारी धान पिकांची कापणी सुरू होणार आहे. या धानाच्या मळणीनंतर लगेच रबी हंगामाच्या कामात जिल्ह्यातील शेतकरी गुंतणार आहेत. १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू होणार आहे. तर गहू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतणार आहे.रबी हंगामासाठी गव्हू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार ९२० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र तीन हजार हेक्टर एवढे आहे. तर हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र चार हजार ०९० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र नऊ हजार हेक्टर आहे. कडधान्यापैकी लाखोळी, वाल, वाटाणा इत्यादीचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ८०० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. जवस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ६३० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १० हजार हेक्टर आहे. तर भाजीपाला पिकाचे प्रस्तावित क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर आहे. तसेच उन्हाळी धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ७६० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे.यावर्षी वेळेवर पावसाने साथ न दिल्यामुळे खरिपात शेतकऱ्यांनी ठरविल्याप्रमाणे लाभ होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता रबीच्या हंगामावर लागून आहे. (प्रतिनिधी)