शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

उपोषणकर्ते व प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 28, 2016 01:52 IST

महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले.

गावकऱ्यांचा आरोप : महालगाव प्रकरणअर्जुनी-मोरगाव : महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले. ५४ दिवस पूर्ण झालेत. मात्र वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या प्रकृतीत बदल नाही. हे कसले उपोषण? याला तहसील व पोलीस प्रशासन एकप्रकारे गुप्तपणे सहकारी करीत असून प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते व प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप पत्रपरिषदेत तेथील काही गावकऱ्यांनी केला. सोबतच हे प्रकरण कुठेतरी संपविण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.महालगाव येथील गट क्र. १७९ मध्ये ०.१० हे.आर. जागा ही १९९६-९७ च्या अतिक्रमण पंजीत बौद्धांचा झेंडा अशी नोंद आहे. येथे नियमितपणे बौद्ध धर्मियांचे सार्वजनिक कार्यक्रम होतात. २००७ मध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत समाजभवनाचे बांधकाम झाले. समाज भवनाच्या समानांतर चार सिमेंटचे कॉलम उभे करुन बौद्ध बांधवांनी वर्गणी गोळा करुन एका खोलीचे बांधकाम केले व याठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. लगेच दुसऱ्या दिवशी गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांनी विरोध दर्शविला. तेव्हापासूनच दोन जातीत हा वाद सुरू झाला. १४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. कलम १४४ लागू करुन कार्यक्रम पार पडला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुन्हा परवानगी मागण्यात आली. प्रशासनाने परवानगी दिली. बंदोबस्तासाठी ५० ते ६० पोलीस तैनात करण्यात आले. बौद्ध समाजबांधव कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मात्र अनु. जमातीच्या लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन ध्वजाभोवती घेराव केला. ज्याप्रकारे आंबेडकर जयंतीला कलम १४४ लागू होती ती कलम बौद्ध पौर्णिमेगच्या दिवशी असती तर हा प्रकार घडलाच नसता. याचा अर्थ प्रशासन त्या लोकांना सहकार्य करीत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. महालगावच्या दर्शनी भागात असलेल्या प्रवेशद्वारावर चार ते पाच महापुरुषांची चित्रे आहेत. यापैकी डॉ. आंबेडकर यांच्या चित्रावर शेण फेकण्यात आले. बौद्ध बांधव प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले तेव्हा अनु. जमातीची लोकं धावून आली. महिलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. जिवे मारणे व खैरलांजीसारखे प्रकरण घडवून आणण्याची धमकी दिली. मारहाणीत ४ महिला व एका पुरुषाला दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात तहसीलदार, पोलीस अधिकारी व अनु. जमातीची लोकं सुनियोजित पद्धतीने अल्पसंख्याक असलेल्या बौद्ध समाजावर अन्याय, अत्याचार करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. सत्यभामा रंगारी या महिलेच्या घरात घसून अनु. जमातीच्या लोकांनी मारहाण केली. गावातील प्रतिष्ठित मंडळी समजवण्यासाठी आल्यास त्यांना सुद्धा मारहाण करु, अशी धमकी योगेश मारगाये, दिनेश मारगाये व मुकेश नाईक यांनी दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. संबंधितांवर रितसर कारवाई करुन हे प्रकरण संपविण्याची अपेक्षा केली. पत्रपरिषदेला रमेश रामटेके, दिलीप रामटेके, वामन खोब्रागडे, हेमंत गोंडाने, ईश्वरदास खोब्रागडे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, नाना शहारे, भाऊराव खोब्रागडे,व्यंकट खोब्रागडे,नरेश रामटेके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)