शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

उपोषणकर्ते व प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 28, 2016 01:52 IST

महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले.

गावकऱ्यांचा आरोप : महालगाव प्रकरणअर्जुनी-मोरगाव : महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले. ५४ दिवस पूर्ण झालेत. मात्र वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या प्रकृतीत बदल नाही. हे कसले उपोषण? याला तहसील व पोलीस प्रशासन एकप्रकारे गुप्तपणे सहकारी करीत असून प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते व प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप पत्रपरिषदेत तेथील काही गावकऱ्यांनी केला. सोबतच हे प्रकरण कुठेतरी संपविण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.महालगाव येथील गट क्र. १७९ मध्ये ०.१० हे.आर. जागा ही १९९६-९७ च्या अतिक्रमण पंजीत बौद्धांचा झेंडा अशी नोंद आहे. येथे नियमितपणे बौद्ध धर्मियांचे सार्वजनिक कार्यक्रम होतात. २००७ मध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत समाजभवनाचे बांधकाम झाले. समाज भवनाच्या समानांतर चार सिमेंटचे कॉलम उभे करुन बौद्ध बांधवांनी वर्गणी गोळा करुन एका खोलीचे बांधकाम केले व याठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. लगेच दुसऱ्या दिवशी गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांनी विरोध दर्शविला. तेव्हापासूनच दोन जातीत हा वाद सुरू झाला. १४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. कलम १४४ लागू करुन कार्यक्रम पार पडला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुन्हा परवानगी मागण्यात आली. प्रशासनाने परवानगी दिली. बंदोबस्तासाठी ५० ते ६० पोलीस तैनात करण्यात आले. बौद्ध समाजबांधव कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मात्र अनु. जमातीच्या लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन ध्वजाभोवती घेराव केला. ज्याप्रकारे आंबेडकर जयंतीला कलम १४४ लागू होती ती कलम बौद्ध पौर्णिमेगच्या दिवशी असती तर हा प्रकार घडलाच नसता. याचा अर्थ प्रशासन त्या लोकांना सहकार्य करीत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. महालगावच्या दर्शनी भागात असलेल्या प्रवेशद्वारावर चार ते पाच महापुरुषांची चित्रे आहेत. यापैकी डॉ. आंबेडकर यांच्या चित्रावर शेण फेकण्यात आले. बौद्ध बांधव प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले तेव्हा अनु. जमातीची लोकं धावून आली. महिलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. जिवे मारणे व खैरलांजीसारखे प्रकरण घडवून आणण्याची धमकी दिली. मारहाणीत ४ महिला व एका पुरुषाला दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात तहसीलदार, पोलीस अधिकारी व अनु. जमातीची लोकं सुनियोजित पद्धतीने अल्पसंख्याक असलेल्या बौद्ध समाजावर अन्याय, अत्याचार करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. सत्यभामा रंगारी या महिलेच्या घरात घसून अनु. जमातीच्या लोकांनी मारहाण केली. गावातील प्रतिष्ठित मंडळी समजवण्यासाठी आल्यास त्यांना सुद्धा मारहाण करु, अशी धमकी योगेश मारगाये, दिनेश मारगाये व मुकेश नाईक यांनी दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. संबंधितांवर रितसर कारवाई करुन हे प्रकरण संपविण्याची अपेक्षा केली. पत्रपरिषदेला रमेश रामटेके, दिलीप रामटेके, वामन खोब्रागडे, हेमंत गोंडाने, ईश्वरदास खोब्रागडे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, नाना शहारे, भाऊराव खोब्रागडे,व्यंकट खोब्रागडे,नरेश रामटेके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)