शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिक्रमणास ग्रा.पं.चे प्रोत्साहन

By admin | Updated: November 18, 2014 22:58 IST

येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे.

अर्जुनी/मोरगाव : येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे. हे अतिक्रमण ताबडतोब काढून गावकऱ्यांसाठी ही जागा मोकळी करून देण्याची मागणी माजी उपसरपंच नामदेव चांदेवार व परशुराम शेंडे यांनी केली आहे. ग्रामपंचायतच्या मालकीची भूमापन क्रमांक ६० ची जागा खुली व पडीत होती. याठिकाणी दूरदर्शन टॉवरकरिता ग्रामपंचायततर्फे कार्यालय बांधकाम झाले. या व्यतिरीक्त काही लोकांचे अतिक्रमण आहे. यासंबधाने २४ फेब्रुवारी रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या उपस्थितीत विशेष मासिक सभा घेण्यात आली. यात गट क्र. ६० च्या ग्रामपंचायत जागेवर सरहद भिंत बांधकामाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी या गटातील ०.६१ आर जागेवर असलेले अतिक्रमण सोडून सरहद भिंत बांधकामाचा ठराव घेण्यात आला. तर पश्चिम दिशेकडील अतिक्रमणधारक सदाशिव पुरोहित व ओम राठी यांच्या घरापासून ग्रा.पं. मालकीची पाच फूट जागा सोडून बांधकाम करावे, असा ठराव घेऊन सरहद भिंतीचे बांधकाम करण्यात आले. अगदी याच पध्दतीने हे बांधकाम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रा.पं. सदस्यांनी हा ठराव घेतला असला तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या ठरावात विरोध दर्शविणे आवश्यक होते. मात्र असा विरोध झाला नाही. यात बरीच मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी खंड विकास अधिकारी व सरपंच यांना सिमांकनाबाबतच्या दस्तावेजांची माहिती पटवून दिली. मात्र अद्यापही यावर कसलाच तोडगा काढण्यात आला नाही. अर्जुनी/मोरगाव ग्रामपंचायततर्फे या तऱ्हेने जागा दिली जात असेल तर गाववासीयांनी या गटात उर्वरित रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून रितसर ग्रामपंचायतकडे अर्ज करण्याचे आवाहन तक्रारकर्त्यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नागपूर, खासदार व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)