शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात साडेनऊ लाखांच्या केळींचे उत्पादन

By admin | Updated: November 10, 2015 02:36 IST

देशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे.

पीक पद्धतीत बदल : कृषी अधिकारी तुमडाम यांचे मार्गदर्शन, कृषी विभागाची शिवार फेरीअरमचंद ठवरे बोंडगावदेवीदेशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे. शेतीला आवश्यक पोषक वातावरण निर्मितीसाठी तसेच नवनवीन पिकांचे उत्पादन घेण्यासाठी बळीराजाने वेळोवेळी आमच्या कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीला बगल देऊन अंशत: पीक पद्धतीमध्ये बदल करुन शेतीमधून नगदी उत्पन्न देणारे पीक घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवार फेरीदरम्यान बोंडगाव, सुरबन, मालकनपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतामधील लावण्यात आलेल्या केळीची बाग, सिमला मिर्ची, भाजीपाला, फळांचे निरीक्षण करताना उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवार फेरीत नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी रामटेके, कृषी पर्यवेक्षक बी.टी. राऊत, एम.बी. ठाकूर, कृषी सहायक पवन काळे आदींचा समावेश होता. तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथील प्रगतीशील शेतकरी योगिराज हलमारे यांच्या केळीच्या बागेला भेट देऊन केळींचे उत्पादन व झाडांचे निरीक्षक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. योगिराज हलमारे या जागरूक शेतकऱ्याने धानाचे पीक न घेता कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनाने केळीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीमध्ये तीन हजार ५०० केळीच्या झाडांची लागवड नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी केली. ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये बागेतील संपूर्ण झाडांना केळाचे फळ लागलेले आहेत. एका झाडाला सरासरी २५ ते ३० किलो वजनाचे घड लावलेले दिसून येत आहेत. केळीच्या बागेमधून सदर शेतकऱ्याला एका झाडापासून २७५ रुपयांचे नगदी उत्पन्न मिळणार आहे. बागेतील तीन हजार ५०० झाडांपासून ९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतामधूनच ११ रुपये प्रतिकिलोच्या भावाने केळीची विक्री सुरू आहे. अडीच एकरामध्ये केळीच्या बागेची लागवड करण्यासाठी त्या शेतकऱ्यास २.५० लाखांचा खर्च आल्याचे सांगण्यात आले. धानाचे पीक सोडून केळीचे उत्पादन घेणाऱ्या योगिराज हलमारे या शेतकऱ्यास पहिल्यावर्षी शुद्ध १२ हजार ५०० रुपयांचा नफा मिळणार आहे. केळीच्या एका झाडापासून त्या शेतकऱ्यास तीन वर्षे उत्पन्न मिळणार आहे. केळीची बाग लावण्यासाठी हेक्टरी ४५ हजाराचे अनुदान तसेच ठिंबक सिंचनाकरिता ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे तुमडाम यांनी सांगितले. मागील वर्षी ७.६२ आर.मध्ये शेतकऱ्यांनी केळीच्या बागा लावल्या होत्या. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ हेक्टरमध्ये केळीच्या बागा लावण्याचे नियोजन केले आहे. सुरबन, बोंडगाव, गोठणगाव, गांभारी इत्यादी ठिकाणी १२ शेतकऱ्यांनी शेडनेट तयार केले आहे. त्यात शिमला मिर्ची, भाजीपाला असे नगदी उत्पन्न देणारे पीक शेतकरी बंधू घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या मनातील नैराश्य सोडून अंशत: पीक पद्धतीत बदल करुन शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने धानाव्यतिरिक्त केळी, मका, शिमला मिर्ची, कारले, हळद, वांगे, अद्रक, आंबा यासारखी नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्याचा दृष्टीकोण अंगी बाळगल्यास शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुख, शांती तसेच लक्ष्मी निश्चितच नांदेल, असा आशावाद तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांची हितगूज साधून व्यक्त केला. याप्रसंगी परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.