शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जनसंवाद कार्यक्रमातून उलगडणार शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:54 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.

ठळक मुद्देसर्व विभागाच्या समन्यवयातूून उपक्रम : पुढील आठवड्यापासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. मात्र त्यांचे वेळीच निराकरण केले जात नाही. त्यामुळे शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. मात्र जिल्ह्यात कृषी विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावून आणि शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यासाठीच जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल, कृषी, सिंचन आणि सर्व विभागाचे कर्मचारी निवड केलेल्या गावात एक दिवस जावून शासनाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. तसेच त्यांच्या समस्यांचा सुध्दा वेळीच निपटारा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यात येणार आहे. लवकरच गावाची निवड केली जाणार असून प्रत्येक आठवड्यातून निवड केलेला गावात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.नो वर्क नो पे चा नियम लागू करणारजिल्ह्यातील बहुतेक विभागाचे अधिकारी कर्मचारी दररोज नागपूर व इतर ठिकाणाहून अपडाऊन करतात. त्यामुळे ते कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. अधिकारी व कर्मचाºयांच्या अपडाऊन संस्कृतीला आळा घालण्यासाठी बॉयामेट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आली असून लवकरच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. तसेच यानंतरही सुधारणा न झाल्यास नो वर्क नो पे यानुसार त्यांचे वेतन कपात केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.