शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जनसंवाद कार्यक्रमातून उलगडणार शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:54 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.

ठळक मुद्देसर्व विभागाच्या समन्यवयातूून उपक्रम : पुढील आठवड्यापासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. मात्र त्यांचे वेळीच निराकरण केले जात नाही. त्यामुळे शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. मात्र जिल्ह्यात कृषी विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावून आणि शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यासाठीच जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल, कृषी, सिंचन आणि सर्व विभागाचे कर्मचारी निवड केलेल्या गावात एक दिवस जावून शासनाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. तसेच त्यांच्या समस्यांचा सुध्दा वेळीच निपटारा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यात येणार आहे. लवकरच गावाची निवड केली जाणार असून प्रत्येक आठवड्यातून निवड केलेला गावात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.नो वर्क नो पे चा नियम लागू करणारजिल्ह्यातील बहुतेक विभागाचे अधिकारी कर्मचारी दररोज नागपूर व इतर ठिकाणाहून अपडाऊन करतात. त्यामुळे ते कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. अधिकारी व कर्मचाºयांच्या अपडाऊन संस्कृतीला आळा घालण्यासाठी बॉयामेट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आली असून लवकरच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. तसेच यानंतरही सुधारणा न झाल्यास नो वर्क नो पे यानुसार त्यांचे वेतन कपात केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.