शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:53 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमहाऑनलाईनवर डॉटा होणार अपलोड

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेब्रुवारी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना याच आधारावर त्या करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता व त्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यात जमा केली जाणार असून याचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केला जाणार आहे. त्यानंतर दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असून मार्च महिन्यात केव्हाही आचार संहिता जाहीर होवू शकते. त्यामुळे त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा व्हावा, यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. यासाठीच त्यांनी महसूल, कृषी आणि सहकार विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. पुढील पंधरा दिवस सर्व कामे बाजुला ठेवून २ हेक्टरपर्यंत खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन त्याची गावपातळीवर छाननी करण्याचे निर्देश दिले आहे. याद्या तयार झाल्यावर त्यांचे १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाव पातळीवर वाचन सुध्दा केले जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत या याद्या थेट शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. सर्व डॉटा अपलोड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळावा, यासाठी याद्या तयार करताना कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांचे अठरा वर्षाखालील मुले असे गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे शेतीचे वेगवेगळे सातबारा असले तरी एकाच कुटुंबात राहत असल्याने वरील सुत्राप्रमाणेच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.छत्तीसगड,मध्यप्रदेशच्या पूर्वी मदत देण्याचा प्रयत्नमध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार जमा करुन त्याचा निवडणुकीत लाभ मिळवून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे शासकीय यंत्रणेला या कामासाठी युध्द पातळीवर कामाला लावण्यात आले आहे.

१ फेब्रुवारी २०१९ नंतरच्यांना लाभ नाहीकेंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा १ फेब्रुवारी २०१९ ला केली. त्यामुळे यानंतर २ हेक्टरपर्यंतचे सातबारा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर शेती आहे त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहे.

रविवारी सुरू राहणार कामेकेंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केवळ निवडणुकीत लाभ मिळवून घेण्यासाठीच केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. त्यामुळेच रविवारी सुटी असली तरी या दिवशी याद्या तयार करण्याचे काम सुरू राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :Governmentसरकार