शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तंटामुक्तीचे अध्यक्षच काढतात मोहिमेचा अनर्थ

By admin | Updated: August 3, 2014 23:28 IST

महाराष्ट्र शासनाने गावातील क्षुल्लक तंटे पोलीस ठाणे किंवा न्यायालयापर्यनत जाऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. मात्र या मोहीमेचा मर्म न ओळखता आपल्याला गावातील सर्व भांडण तंटे

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने गावातील क्षुल्लक तंटे पोलीस ठाणे किंवा न्यायालयापर्यनत जाऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. मात्र या मोहीमेचा मर्म न ओळखता आपल्याला गावातील सर्व भांडण तंटे सोविण्याचा व त्या तंट्यांवर निर्णय देण्याचा अधिकार मिळाला असा चुकीचा अर्थ काढून अनेक तंटामुक्त अध्यक्ष फौजदारी प्रकरणांना छेडतात. यामुळे पोलिसांच्या व न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ होते.गंभीर स्वरूपाच्या तंट्यांना हाताळण्याचा अधिकार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहीमेचा उद्देश गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्याचा आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविले जावे. वादामुळे दोन्ही पक्षाचा वेळ व पैश्याचा अपव्यय होते. पोलिस व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा भार वाढतो. हे होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली. या मोहिमेने राज्यात आमूलाग्र बदल घडून आला. राज्जातील लाखो तंटे एकाच वर्षात सामोपचाराने सोडविण्यात आले. परंतु काही समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी शासन निर्णयाचा बरोबर अभ्यास न करता तंटामुक्त मोहीम गावातील आपल्याला सर्वच प्रकारचे तंटे सोडविण्याचा अधिकार आहे, असा चुकीचा अर्थ काढून गावातील फौजदारी व गंभीर प्रकरणांना हाताळतात हे चुकीचे आहे. लहान-लहान तंट्यांचे मोठ्या वादात पर्यावसान होऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहीमेचा चांगला उद्देश पाहून लोकचळवळ उभी झाली.गावातील दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर तंटे सोडविल्या जाऊ लागले. गावातील तंटे सोडवून नागरिकांच्या पैश्याची व वेळेची बचत होऊ लागल्याने तंटामुक्त अध्यक्षाला गावात सन्मानाचे स्थान मिळू लागले. परंतु याचा फायदा घेत अनेक तंटामुक्त अध्यक्षांनी शासन निर्णयाचा योग्य अभ्यास न करता फौजदारीच्या कलम ३२० अंतर्गत असलेल्या सीआरपीसीमध्ये वर्गीकृत तंट्यांनाही हाताळले. तंटामुक्त समितीने लहान मारामारी, कुंपनाचे वाद, शेतीचे वाद व वैनमस्य हे प्रकरणे मिटविण्यासाठी गावात दोन्ही पक्षाला एकत्र बोलावून त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या वादात दोन्ही पक्षातील एक पक्ष तयार नसला तर तो वाद तंटामुक्त गाव समिती सोडवू शकत नाही. परंतु अनेक तंटामुक्त अध्यक्षांनी आपल्याला जणू तंट्यांवर निर्णय देण्याचा अधिकारच मिळाला असे गृहीत धरून अनेक प्रकरणात निर्णय देण्याचा प्रयत्न केला. या तंटामुक्त अध्यक्षांमुळे पोलिसांच्या कामात अडचण झाली. खून, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी अश्या तंट्यांना न्यायालयात चालविणे आवश्यक आहे. परंतु काही समित्यांनी अश्या प्रकरणांना आपल्याकडे घेतल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)