शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:42 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा : पिकांना संजीवनी, शेतकरी लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा महिना म्हणून ओळखला जाणार जुलै महिना अर्ध्याहून अधिक लोटूनही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरमधील धानाचे पऱ्हे आणि १२०० एकरमधील रोवणी संकटात आली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले असते. मात्र रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. ही रिपरिप मंगळवारी सकाळी १० वाजतापर्यंत कायम होती. त्यामुळे कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली.मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोर ८४.४, महागाव ८७.४ आणि केशोरी ९६.४ मि.मी. पाऊस झाल्याने या तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पावसाअभावी अजुनही नदी, नाले भरलले नाहीत.पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान सरासरी ६५९.४८ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा ३० जुलैपर्यंत केवळ ३७६.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहिल्यास जवळपास ४३ टक्के पावसाची तूट कायम आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती