शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:42 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा : पिकांना संजीवनी, शेतकरी लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा महिना म्हणून ओळखला जाणार जुलै महिना अर्ध्याहून अधिक लोटूनही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरमधील धानाचे पऱ्हे आणि १२०० एकरमधील रोवणी संकटात आली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले असते. मात्र रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. ही रिपरिप मंगळवारी सकाळी १० वाजतापर्यंत कायम होती. त्यामुळे कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली.मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोर ८४.४, महागाव ८७.४ आणि केशोरी ९६.४ मि.मी. पाऊस झाल्याने या तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पावसाअभावी अजुनही नदी, नाले भरलले नाहीत.पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान सरासरी ६५९.४८ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा ३० जुलैपर्यंत केवळ ३७६.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहिल्यास जवळपास ४३ टक्के पावसाची तूट कायम आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती