शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:42 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा : पिकांना संजीवनी, शेतकरी लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा महिना म्हणून ओळखला जाणार जुलै महिना अर्ध्याहून अधिक लोटूनही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरमधील धानाचे पऱ्हे आणि १२०० एकरमधील रोवणी संकटात आली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले असते. मात्र रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. ही रिपरिप मंगळवारी सकाळी १० वाजतापर्यंत कायम होती. त्यामुळे कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली.मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोर ८४.४, महागाव ८७.४ आणि केशोरी ९६.४ मि.मी. पाऊस झाल्याने या तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पावसाअभावी अजुनही नदी, नाले भरलले नाहीत.पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान सरासरी ६५९.४८ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा ३० जुलैपर्यंत केवळ ३७६.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहिल्यास जवळपास ४३ टक्के पावसाची तूट कायम आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती