शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

घाटकुरोडा-घोगरा, देव्हाळा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:36 IST

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापही दुरूस्ती न केल्याने विद्यार्थी आणि या मार्गावर ये-जा करणाºया गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्षभरातच रस्त्याचे हाल : विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापही दुरूस्ती न केल्याने विद्यार्थी आणि या मार्गावर ये-जा करणाऱ्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा परिसरात सर्वात मोठे रेती घाट आहे. त्यामुळे या रेतीघाटावरुन रेती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरू असते. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर खड्डे पडून चिखल तयार झाले आहे.त्यामुळे खरोखरच येथे रस्ता आहे का असा प्रश्न पडतो. रेती भरलेले ट्रक घाटकुरोडा, घोगरा ते देव्हाळा या रस्त्याने निघून सरळ मार्गाने नागपूर ते गोंदियाकडे जातात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्ते फूटून जीर्ण झालेले आहेत. त्या खड्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला थांबून वाहने जाईपर्यंत प्रतीक्षा करतात. या रस्त्याने घाटकुरोडा येथील अनेक नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.देव्हाळा येथे एलोरा पेपर मिल असल्यामुळे बरेच कामगार या पेपरमिलमध्ये कामावर जात असतात. पण हा रस्ता खराब झाल्यामुळे कामगारांना सुध्दा या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. याच मार्गावरुन घोगरा, घाटकुरोडा ते तिरोडा-तुमसर आगाराची एसटी बस सुरु आहे. मानव विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बस सुरु आहे. पण ती देखील खराब रस्त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. घाटकुरोडा येथील बरेच व्यावसायीक आपला भाजीपाला घेवून गोंदिया ते नागपूरकडे जातात. त्यांना सुध्दा रस्त्याच्या दुर्दशेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेवून रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.