शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.

ठळक मुद्देगोंदिया महसूल मंडळात अतिवृष्टी : १९.२ मि.मी.पावसाची नोंद, रबीतील हरभरा,गहू भूईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ६६ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. तर ११ जानेवारीपर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने या नुकसानीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस अधून मधून पडत असल्याने धान खरेदी केंद्रावर ठेवलेल्या धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची खरेदी करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.यंदा जिल्ह्यात एकूण ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे.यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर गहू आणि हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पंचनामे करुन नुकसान भरपाईअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात या दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढणारजिल्ह्यात मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील तूर आणि इतर पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस