शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

झटू सर्व भावे, करू स्वर्ग गावा..!

By admin | Updated: June 8, 2014 00:00 IST

आदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा

गुरूदेव सेवक ठाकूर गुरूजी : २३0 गावांत सेवा मंडळाच्या शाखा स्थापननरेश रहिले - गोंदियाआदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा उत्तम मार्ग ग्रामगीतेतून सांगितला. या ग्रामगीतेची वाणी प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी ६८ व्या वर्षीही ठाकूर गुरूजी तेवढय़ाच उत्साहाने धडपडत आहेत. नि:स्वार्थपणे पुढील पिढीवर योग्य संस्कार घडविण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्याच तोंडून जाणून जाणून घेतलेली ही माहिती.गोंदियातील जे.एम. हायस्कूल सिव्हील लाईन शाखेत शिक्षक म्हणून ठाकूर गुरूजींनी काम केले. शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थी घडविणे, त्यांना आदर्श नागरिक बनविणे हा त्यांचा स्वभावगुण होता. विद्यार्थ्याना आदर्श नागरिक घडविण्याच्या  तळमळीतूनच त्यांनी सेवानवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. ‘तन-मन से गाऊंगा तेरा भजन, ऊँचा उठा दे मेरा प्यारा वतन,’ हे राष्ट्रसंतांचे भजन गात गावागावांत गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन करण्यावर जोर दिला. नोकरी पेशा करणारे व्यक्ती सेवानवृत्तीनंतर आराम करण्यास पसंत करतात. मात्र ‘आराम हराम है’ या युक्तीला अंगीकारून त्यांनी  समाजकार्यात वाहून घेतले. याबद्दल सांगताना ते म्हणतात, सेवाभावातूनच ईश्‍वर भक्ती होते. राष्ट्रसंतांचा विज्ञानवादी दृष्टिकोन पुढे ठेवून भजनाच्या माध्यमातून गावागावात राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा अर्थबोध समाजाला करवून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. लोकांनी यावे, गुरूदेव सेव मंडळाशी जुळाले आणि त्यांचे तत्व अंगीकाराने असा प्रयत्न असतो. अनेकांना हे पटते. त्यातूनच जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक लोकांना गुरूदेव सेवा मंडळाशी जुळवण्यात यश आल्याचे गुरूजींनी सांगितले.सद्यस्थितीत समाजात दारू, जुगार, खर्रा, गुटखा, तंबाखू अशी वाईट व्यसने समाजाला लागली आहेत. या व्यसनामुळे येणारी पिढी नैराश्याच्या खाईत लोटत चालली आहे. त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी व सन्मार्गाला लागण्यासाठी तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या भजनांचा आधार घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांच्या शोषणावर आवाज उठविताना हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार यावर प्रबोधन करीत हुंडा देऊ नका, मागू नका, स्त्रीयांचा सन्मान करा अशी आर्त हाक ते समाजाला देत आहेत. त्यासाठी ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी नमुद केलेल्या ओव्यांमधून ते समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणांनी आळशी न होता, आणि उच्च शिक्षणाचा आव न दाखविता आपल्या शेतीला पडीक ठेऊ नये. उच्च शिक्षण घेऊनही शेतीत नांगर पकडायची लाज वाटू देऊ नका, गोपालन करा असे ठाकूर गुरूज सांगतात. शेतीच्या कामाकडे हल्ली दुर्लक्ष करण्यात आले. शेतीच्या कामात करावी लागणारी मेहनत आजच्या तरूणांना परवडण्यासारखी वाटत नसल्याने शेतीसाठी मानसे मिळत नाही.  त्या शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यागेल्याने बेरोजगारीत वाढ झाली. शेती न पिकविता मजूरीसाठी शहरात पलायन करणार्‍या मजूरांना राष्ट्रसंताच्या भजनाची आठवण करून दिली. ‘सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबे ना कोणी, उटला सुटला नोकर होतो, पैश्यासाठी लोभानी’ ही परिस्थिती समाजाची असल्याचे ते म्हणाले.मी नवव्या वर्गात असताना आमगावच्या गुरूदेव टेकडीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते. त्यांच्या कीर्तनाने माझे अंतरंग बदलले. त्यानंतर मी वंदनीय महाराजांच्या ‘लहरकी बरखा’ या पुस्तकातील २५0 श्लोक पाठांतर केले. त्या ोकांचा वक्तृत्वात भर पाडण्यास मदत झाली. आपल्या पेंशनमधील महिन्याकाठी ३ हजार रूपये राष्ट्रसंताच्या प्रचारासाठी आता खर्च करीत आहे. माझे चित्त, देह, भान राष्ट्रसंताच्या साहित्याच्या प्रचारासाठी आहे. त्यांच्या ग्रामगीतेतून आदर्श गावाची संकल्पना राबविण्यास आता महाराष्ट्र शासनही सरसावले, याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.‘खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो देह कार्यी पडू दे,घडू दे प्रभू, एवढे हे घडू दे’ हे लक्षात ठेवून आपण गावाला स्वर्गासारखे करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ठाकूर गुरूजी म्हणाले.