शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

उखडलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: October 22, 2014 23:20 IST

तिरोडा शहर अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मुळे सर्वदूर सुपरिचित झाले आहे. येथील रेल्वे स्थानक व रेल्वे पथवाहिन्यांमुळे या तालुक्याची विभागणी दोन भागात झालेली आहे. तिरोडा शहराच्या खैरलांजी

गोंदिया : तिरोडा शहर अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मुळे सर्वदूर सुपरिचित झाले आहे. येथील रेल्वे स्थानक व रेल्वे पथवाहिन्यांमुळे या तालुक्याची विभागणी दोन भागात झालेली आहे. तिरोडा शहराच्या खैरलांजी मार्गावर तालुक्यातील अर्धी गावे वसलेली आहेत. या गावांतील नागरिक आपल्या विविध कामांसाठी तिरोडा शहरालगत असलेल्या चिरेखनी गावातून रामसागर मार्गे तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये जातात. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत येणारा रस्ता खड्ड्यात पूर्णपणे हरविल्याने तालुक्यातील अर्ध्याधिक गावांतील नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमय रस्त्याच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तिरोडा तहसील कार्यालयाजवळच उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तिरोडा रेल्वे स्थानक आहे. शहरापासून खैरलांजी (बालाघाट) रस्त्यावरील अनेक गावांतील नागरिक आपल्या विविध कामांसाठी या कार्यालयांत व रेल्वे स्थानकात याच मार्गाने ये-जा करतात. मात्र या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालविणे तर दूर पायी चालणेसुद्धा अत्यंत कठिण होवून गेले आहे. वाहन चालकाने एक खड्डा जरी वाचविण्याचा प्रयत्न केला तर वाहन दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अनेकदा येथे लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या रस्त्याच्या दयनिय अवस्थेमुळे केवळ एकाच गावातील नागरिकांना त्रास होत नाही, तर तालुक्यातील जवळपास अर्ध्याधिक गावांतील नागरिकांना त्रास होतो. तिरोडा खैरलांजी मार्गावरील चिरेखनी, भुराटोला, पालडोंगरी, पुजारीटोला, करटी बु., इंदोरा बु., विहिरीया, बघोली, अर्जुनी तसेच यानंतर धापेवाडा मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परसवाडा, गोंडमोहाळी, बोदा, अत्री, सोनेगाव, डब्बेटोला, जमुनिया आदी अनेक गावातील नागरिक या चिरेखनी-रामसागर मार्गे दररोज सकाळ ते सायंकाळपर्यंत रेल्वे स्थानक व तहसील कार्यालयासह अनेक कार्यालयांत ये-जा करतात. मात्र हा रस्ताच खड्ड्यात हरविल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी मोठाच त्रास होतो. उल्लेखनिय म्हणजे हा रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे की, या मार्गावरून कोणतेही आॅटो किंवा काळी-पिवळीधारक आपले वाहन नेत नाही. सद्यस्थितीत या रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. वाहन चालकाने कितीही कसोशीने येथून वाहन चालविण्याचा प्रयत्न केला तरी वाहन खड्ड्यात गेल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडतो. या प्रकारामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांमध्ये वाद वाढून एकमेकांना शिवीगाळ केली जाते. कधी-कधी या भांडणाचे रूपांतर मारहाणीतही होते. तर कधी वाहनांमुळे अंगावर उडालेल्या चिखलामुळे त्या वाहन धारकाचा पाठलाग करून त्याला गाठले जाते व चांगलाच चोप दिला जातो. या सर्व समस्या केवळ त्या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे उद्भवतात. मागील १० ते १२ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. सुधारणा म्हणून खड्ड्यांमध्ये साधे मुरूमदेखील घालण्यात आले नाही. या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे तर आहेतच, पण रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्णपणे उखडून डबरे तयार झालीत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहन चालविणे कठिण झाले आहे. खैरलांजी मार्गावरून चिरेखनीचे प्रवेशद्वार ते नालंदा बुद्धविहारपर्यंतचा रस्ता केवळ काही प्रमाणात चांगला आहे. त्यानंतरच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. यानंतर चिरेखनी ग्रामपंचायत ते रामसागरपर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय व पूर्णत: डांबरीकरण उडलेल्या स्थितीत आहे. रामसागर ते तिरोडा तहसील कार्यालयापर्यंत थोड्या-थोड्या अंतरावर मोठाले खड्डे असून त्यात घाण पाणी साचले आहे. (प्रतिनिधी)