शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कोहळीपार तलावाची पाळ फुटण्याची शक्यता

By admin | Updated: August 10, 2014 23:05 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा घात होण्याची भीती आहे. शेतातील धानपीक तसेच लागून असलेल्या कोयलारी, प्रधानटोला व सालेधाटणी हे गावे पाण्याखाली येण्याची दाट शक्यता असल्यामुळे गावकरी धास्तावले आहेत. जिल्हा परिषद गोंदिया लघु पाटबंधारे उपविभाग आमगावतर्फे सन १९९४ मध्ये कोहळीपार शिवारात जंगलाला लागून ६५ एकर जमिनीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. कमीत कमी ५०० एकर जमिनीला सिंचनाची सोय होईल, हे उद्दिष्ट होते. कास्तकारांना पाणी पुरवठा करण्यासाठी नहरसुध्दा तयार करण्यात आला आहे. परंतु या विस वर्षाच्या काळात त्या नहराची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे तो बुजला व तलावातील पाणी नहराव्दारे न जाता जवळील कास्तकारांच्या शेतातून वाहते. त्यामुळे धानपिकाचे त्याचप्रमाणे ऊस व तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान होते. जंगल परिसरात हा तलाव असल्यामुळे पाण्याचा साठा मोठा प्रमाणात होते. त्यामुळे वेस्ट वेअरमधून लवकरच पाणी वाहायला सुरूवात होते. अशातच वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत पाण्याने तलावाच्या पारीला खुरपत नेले आहे. त्यामुळे केव्हाही पार फुटून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच तलावाला लागून कोयलारी गावतलाव आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने त्या तलावाच्या पाळीला मधोमध खड्डा पडून जोरजोराने पाणी वाहत होते. गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे वेळीच उपाययोजना करण्यात आली व हानी टळली. त्याचप्रमाणे नजीकच असलेल्या पुतळी येथील तलावाची पाळ फुटून शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी कोयलारी येथील ह.भ.प. बळीराम पाथोडे, टिकाराम बडोले व सरपंच हिरालाल मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने जि.प. पाटबंधारे विभाग गोंदिया, लघु पाटबंधारे उपविभाग आमगाव व तहसीलदार सडक/अर्जुनी यांना लेखी निवेदनातून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु एकही अधिकारी फिरकला नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागाने पावसाळा संपताच वेस्ट वेअरची जागा बदलावी. त्याचप्रमाणे नहराची (पाटाची) सफाई अविलंब करावी जेणेकरून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत नहराचे पाणी पोहचू शकेल. (वार्ताहर)