शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

लोकसभेसाठी ११ एप्रिल रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:33 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार मतदारांसाठी १२८१ केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख २६ हजार २९४ पुरुष तर १ लाख २३ हजार ९६४ महिला व इतर १ असे एकूण २ लाख ५० हजार २५९ मतदार आहेत. (६४) तिरोडा विधानसभा क्षेत्रात १ लाख २४ हजार ५९१ पुरुष तर १ लाख २६ हजार ५९८ महिला असे एकूण २ लाख ५१ हजार १८९ मतदार आहेत. (६५) गोंदिया विधानसभा क्षेत्रात १ लाख ५३ हजार ४२० पुरुष तर १ लाख ५९ हजार १७१ महिला असे एकूण ३ लाख १२ हजार ५९१ मतदार असून (६६) आमगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख ३१ हजार ४१० पुरुष तर १ लाख ३० हजार ४८७ महिला असे एकूण २ लाख ६१ हजार ८९७ मतदार मतदार आहेत.एकंदर जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार ७१५ पुरुष तर ५ लाख ४० हजार २२० महिला मतदार तर इतर १ असे १० लाख ७५ हजार ९३६ मतदार असून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. यात, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ३१६, तिरोडा २९५, गोंदिया ३६० व आमगाव ३१० मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले आहे.महाराष्ट्रात चार टप्यात होणाऱ्या निवडणुकीत ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया व गडचिरोली या क्षेत्राची निवडणूक होणार आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.निवडणुकीत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.यादीत नाव असणे आवश्यकज्या मतदारांकडे मतदान कार्ड आहे परंतु त्यांचे नाव मतदार यादीत नसेल अशांना मतदान करता येणार नाही. यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या यादीतून करुन घ्यावी, नाव नसेल तर यादीत नाव आणण्यासाठी वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करीत १९५० या टोलफ्री क्रमांकावर आपल्या शंका मतदार नोंदवू शकतात व त्यांच्या शंकाचे समाधान करण्यात येईल असे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले.मतदान केंद्रावर विशेष सुविधामतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे मतदान केंद्रावर लांब रांग असेल त्या ठिकाणी शेडची सोय, अपंगासाठी व्हीलचेअर किंवा वाहनांची सोय करण्यात येणार आहे.मतदारांची भर पडणार१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार, जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ मतदार आहेत. मात्र ज्यांची नावे सुटली आहेत त्यांना संधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ व २३ फेब्रुवारी रोजी तसेच २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यातही मतदारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे मतदारांची भर पडणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक