शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लोकसभेसाठी ११ एप्रिल रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:33 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार मतदारांसाठी १२८१ केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख २६ हजार २९४ पुरुष तर १ लाख २३ हजार ९६४ महिला व इतर १ असे एकूण २ लाख ५० हजार २५९ मतदार आहेत. (६४) तिरोडा विधानसभा क्षेत्रात १ लाख २४ हजार ५९१ पुरुष तर १ लाख २६ हजार ५९८ महिला असे एकूण २ लाख ५१ हजार १८९ मतदार आहेत. (६५) गोंदिया विधानसभा क्षेत्रात १ लाख ५३ हजार ४२० पुरुष तर १ लाख ५९ हजार १७१ महिला असे एकूण ३ लाख १२ हजार ५९१ मतदार असून (६६) आमगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख ३१ हजार ४१० पुरुष तर १ लाख ३० हजार ४८७ महिला असे एकूण २ लाख ६१ हजार ८९७ मतदार मतदार आहेत.एकंदर जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार ७१५ पुरुष तर ५ लाख ४० हजार २२० महिला मतदार तर इतर १ असे १० लाख ७५ हजार ९३६ मतदार असून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. यात, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ३१६, तिरोडा २९५, गोंदिया ३६० व आमगाव ३१० मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले आहे.महाराष्ट्रात चार टप्यात होणाऱ्या निवडणुकीत ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया व गडचिरोली या क्षेत्राची निवडणूक होणार आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.निवडणुकीत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.यादीत नाव असणे आवश्यकज्या मतदारांकडे मतदान कार्ड आहे परंतु त्यांचे नाव मतदार यादीत नसेल अशांना मतदान करता येणार नाही. यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या यादीतून करुन घ्यावी, नाव नसेल तर यादीत नाव आणण्यासाठी वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करीत १९५० या टोलफ्री क्रमांकावर आपल्या शंका मतदार नोंदवू शकतात व त्यांच्या शंकाचे समाधान करण्यात येईल असे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले.मतदान केंद्रावर विशेष सुविधामतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे मतदान केंद्रावर लांब रांग असेल त्या ठिकाणी शेडची सोय, अपंगासाठी व्हीलचेअर किंवा वाहनांची सोय करण्यात येणार आहे.मतदारांची भर पडणार१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार, जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ मतदार आहेत. मात्र ज्यांची नावे सुटली आहेत त्यांना संधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ व २३ फेब्रुवारी रोजी तसेच २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यातही मतदारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे मतदारांची भर पडणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक