शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

३४१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:16 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देउमेदवारांसाठी कत्तल की रात : निवडणूक प्रशासन सज्ज, चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.नक्षलप्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत तर इतर भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने ती रद्द केली. तर चार ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३४७ सरपंचपदांसाठी एकूण १ हजार ५१ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदांसाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे.यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने या पदासाठी चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. याच निवडणुकीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवंलबून असते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी ग्रामीण भागात तळ ठोकून आहेत. शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिल्याचे चित्र होते.दरम्यान सरपंच आणि सदस्यपदांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशिल आणि नक्षलप्रभावीत भागातील मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे.भेटीगाठी आणि आश्वासने३४१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.१५) सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आणि त्यांचे मन वळविण्यावर भर दिला. मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच क्लृप्त्यांचा वापर उमेदवारांकडून केला जात होता. सोमवारी मतदान होणार असल्याने मते मिळावी, यासाठी उमेदवारांचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवारची रात्र कत्तल की रात होती.एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.संवेदनशील मतदान केंद्रांवर नजरनिवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.