शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

३४१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:16 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देउमेदवारांसाठी कत्तल की रात : निवडणूक प्रशासन सज्ज, चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.नक्षलप्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत तर इतर भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने ती रद्द केली. तर चार ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३४७ सरपंचपदांसाठी एकूण १ हजार ५१ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदांसाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे.यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने या पदासाठी चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. याच निवडणुकीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवंलबून असते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी ग्रामीण भागात तळ ठोकून आहेत. शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिल्याचे चित्र होते.दरम्यान सरपंच आणि सदस्यपदांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशिल आणि नक्षलप्रभावीत भागातील मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे.भेटीगाठी आणि आश्वासने३४१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.१५) सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आणि त्यांचे मन वळविण्यावर भर दिला. मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच क्लृप्त्यांचा वापर उमेदवारांकडून केला जात होता. सोमवारी मतदान होणार असल्याने मते मिळावी, यासाठी उमेदवारांचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवारची रात्र कत्तल की रात होती.एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.संवेदनशील मतदान केंद्रांवर नजरनिवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.