शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

गेल्या वेळेपेक्षा मतदान १.२७ टक्क्यांनी कमी

By admin | Updated: October 16, 2014 23:26 IST

मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावला पाहिजे यासाठी मतदारांत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. मात्र या अभियानाला पाहिजे तो प्रतिसाद दिसून आला नाही.

गोंदिया : मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावला पाहिजे यासाठी मतदारांत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. मात्र या अभियानाला पाहिजे तो प्रतिसाद दिसून आला नाही. सन २००९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ७०.३८ टक्के मतदानाची नोंद असतानाच यंदा त्यात घट होऊन ६९.११ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविण्यात आली आहे. आपल्या एका मतावर देशाचे भविष्य निर्भर असते असे म्हटले जाते व म्हणूनच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्यावर भर दिला जातो. मात्र दिवसेंदिवस मतदानाला घेऊन मतदारांची अनास्था वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून तरी मतदार पुढे येतील या विश्वासातून यंदा जनजागृतीवरही भर देण्यात आला. मात्र यातूनही पाहिजे तसे निकाल हाती आले नसल्याचे म्हणता येईल अशी आकडेवारी जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकींची टक्केवारी दाखवून देते. १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदानात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७१.४६ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ६९.७५ टक्के, गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६६.२३ टक्के तर आमगाव विधानसभा क्षेत्रात ६९.६२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन २००९ मध्ये घेण्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत जिल्ह्यात यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारीची नोंद आहे. त्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७३.९२ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ७२.५३ टक्के, गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६५.०९ टक्के तर आमगाव क्षेत्रात ७० टक्के मतदानाची नोंद आहे.