शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना संपविण्याचा डाव

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत.

प्रकाश आंबेडकर : सरकारला पुन्हा आणायचाय मनुवादगोंदिया : सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत. ज्याची चूक झाली असेल त्या नेत्याला जरूर शिक्षा द्या, पण सरकारला दुसरा कोणता पक्षच नको आहे. त्यामुळे नेत्यासोबत त्याच्या पक्षालाही दोषी ठरविण्याचा प्रयत्न करून सर्व राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.गोंदियात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेवर ते बोलत होते. शुक्रवारच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीका करताना हा ‘जगलरी बजेट’ असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातील ८२ टक्के पैसा आस्थापनेवर खर्च होत आहे. केवळ सात टक्के खर्च विकास कामांवर होत आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा बोझा टाकला जाणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत या सरकारने निर्माण केले नसल्याचे ते म्हणाले.राज्यपालांच्या निर्देशानुसार विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी एक हजार कोटींचा निधी मिळाला होता. पण हा निधी पूर्ण काम झालेल्या धरणांवर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. या निधीचा विनियोग नियमानुसार झालाच नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री विदर्भातील असो की, पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भावर अन्याय हा कायमच असल्याचे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले. सरकारच्या धोरणांवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, शासनाचं धोरण अनुदान देण्याचं आणि कोणाला मदत करण्याचे नाही. मराठवाड्यात कधी नव्हती एवढी भीषण परिस्थिती यावर्षी आहे. तरीही सरकार तेथील लोकांना दिलासा देण्यास तयार नाही. त्यामुळे आपण तेथील लोकांसाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करून कंपन्यांना हाताशी धरत कॉर्पोरेट लूट करीत असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत मुख्य राजकीय शिल्लक राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही परिस्थिती म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले.अशिक्षित आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे. यातून नव्याने मनुवाद जन्माला येत आहे. परंतू आम्ही हे खपवून घेणार नाही. येत्या ३ एप्रिलला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आंबेडकरी चळवळ, मार्क्सवादी, ओबीसी संघटना यांना एकत्रित करून जाती अंताकडून राष्ट्रवादाकडे या विषयावर परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.मनुवाद नको असलेल्या सर्व लोकांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले. या पत्रपरिषदेला भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, महासचिव प्रफुल भालेराव, बी.जी. डोंगरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)