शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राजकीय पक्षांना संपविण्याचा डाव

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत.

प्रकाश आंबेडकर : सरकारला पुन्हा आणायचाय मनुवादगोंदिया : सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत. ज्याची चूक झाली असेल त्या नेत्याला जरूर शिक्षा द्या, पण सरकारला दुसरा कोणता पक्षच नको आहे. त्यामुळे नेत्यासोबत त्याच्या पक्षालाही दोषी ठरविण्याचा प्रयत्न करून सर्व राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.गोंदियात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेवर ते बोलत होते. शुक्रवारच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीका करताना हा ‘जगलरी बजेट’ असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातील ८२ टक्के पैसा आस्थापनेवर खर्च होत आहे. केवळ सात टक्के खर्च विकास कामांवर होत आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा बोझा टाकला जाणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत या सरकारने निर्माण केले नसल्याचे ते म्हणाले.राज्यपालांच्या निर्देशानुसार विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी एक हजार कोटींचा निधी मिळाला होता. पण हा निधी पूर्ण काम झालेल्या धरणांवर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. या निधीचा विनियोग नियमानुसार झालाच नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री विदर्भातील असो की, पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भावर अन्याय हा कायमच असल्याचे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले. सरकारच्या धोरणांवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, शासनाचं धोरण अनुदान देण्याचं आणि कोणाला मदत करण्याचे नाही. मराठवाड्यात कधी नव्हती एवढी भीषण परिस्थिती यावर्षी आहे. तरीही सरकार तेथील लोकांना दिलासा देण्यास तयार नाही. त्यामुळे आपण तेथील लोकांसाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करून कंपन्यांना हाताशी धरत कॉर्पोरेट लूट करीत असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत मुख्य राजकीय शिल्लक राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही परिस्थिती म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले.अशिक्षित आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे. यातून नव्याने मनुवाद जन्माला येत आहे. परंतू आम्ही हे खपवून घेणार नाही. येत्या ३ एप्रिलला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आंबेडकरी चळवळ, मार्क्सवादी, ओबीसी संघटना यांना एकत्रित करून जाती अंताकडून राष्ट्रवादाकडे या विषयावर परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.मनुवाद नको असलेल्या सर्व लोकांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले. या पत्रपरिषदेला भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, महासचिव प्रफुल भालेराव, बी.जी. डोंगरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)