शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

पीक विमा योजनेत लूट

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

पीक विमा योजनेत लूट; मानोरा येथील शेतकर्‍यांचा आरोप : पाच वर्षाच्या हिशोबाची मागणी.

मानोरा : शेतकर्‍यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या हिताची नसून लुबाडणारी व फसवणूक करणारी योजना असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. लालुच दाखवून आपली फसवेगिरी केली जात असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. मागील पाच वर्षात शेतकर्‍यांची विम्याच्या नावे दिलेल्या रकमेचा हिशेब पाहून विम्याची रक्कम किती देण्यात आली व कोणाला देण्यात आली, त्यांची नावे जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शासन आणि विमा कंपनीने साठगाठ करून लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. पीक विमा योजना ही शेतकर्‍यांची फसवणूक करणारी योजना असून याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पिकविम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकर्‍यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकर्‍यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सतत तीन वर्ष नुकसान झाले असेल किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५0 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकर्‍यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतवृष्टी, रोग व किडीेच उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगीतले. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग शेतकर्‍यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास निश्‍चित पीक विम्याचा लाभ मिळेल, अशी हमी देण्यात यावी. शेतकर्‍यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकर्‍यांकरिता आखलेली पीकविमा योजना सुद्धा कृषी विभाग, शासन आणि विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.