शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

प्लास्टिक पर्यावरणाला घातक, तर दारू पोषक काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:17 IST

महाराष्ट्र शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या निर्णयाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. मात्र दारु बंदीवर मौन बाळगल्याने ती शरीरास पोषक आहे का? असा सवालही उपस्थित केव्हा जात आहे.

ठळक मुद्देदारूबंदीच्या निर्णयावर शासन गप्प : प्लास्टिक बंदीचा निर्णय स्वागतार्ह

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : महाराष्ट्र शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या निर्णयाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. मात्र दारु बंदीवर मौन बाळगल्याने ती शरीरास पोषक आहे का? असा सवालही उपस्थित केव्हा जात आहे.प्लास्टिकचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम विचारात घेऊन राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागतही होत आहे. मात्र संसाराचा नाश करणाऱ्या दारूबंदीवर मौन बाळगल्याने निंदाही होत आहे.शासनाने प्लास्टिक बंदीचा आदेश यापूर्वीही काढला होता. मात्र त्या निर्णयाचे पालन उत्पादक व विक्रेत्यांनी न केल्याने प्लास्टिक वस्तंूचा सर्रास वापर सुरूच होता. मात्र प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी सर्वच प्लास्टिक उत्पादक व विक्रेत्यांनी सुरु केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.परिणामी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग घेऊन हातभार लावण्याचे काम जिल्हावासीय करीत आहेत.परंतु, ज्या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, महिलांवर अत्याचार वाढतच आहेत, खून, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्या दारूबंदीविषयी काय? घरातील एक व्यक्ती दारु प्राशन करुन कुटुंबातील सर्वांनाच यातना देतो. त्यामुळे शासन कायमस्वरुपी दारुबंदी का करीत नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. उलट ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेऊन आपापल्या गावात दारुबंदी करावी, असा मोफतचा सल्ला देण्यात नेते, पुढारी आघाडीवर आहेत. महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारुबंदीचा पुरेपूर प्रयत्नही केला. मात्र त्याच महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले व विक्रेत्यांना छूपे शह देऊन त्यांचे बरेचदा पोलिसांकडून हित जोपासले जाते, ही वस्तुस्थिती आहे.महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली, त्याचप्रमाणे दारूबंदीवरही निर्णय घ्यावा, अशी मागणी शेंडा परिसरातील गावकºयांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीliquor banदारूबंदी