शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

प्लास्टिकबंदी मोहिमेतून १.६५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देसुमारे अडीच टन साहित्य जप्त : नगर परिषद पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना नगर परिषदेच्या पथकाने शहरात ३३ कारवाया करून प्रत्येकी प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे, बंदी लावण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकमध्ये येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांचा अतिरेकी वापर सर्वात जास्त हानीकारक ठरत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरिही त्याचे परिपूर्ण अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.प्लास्टीक बंदी अंतर्गत नगर परिषदेने २५ जून २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशेष मोहीम राबवून प्लास्टीक विक्रे ते दुकानदारांवर कारवाई केली. नगर परिषदेच्या या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २१६ दुकानदारांवर धाड घालून त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त केले आहे.याशिवाय ३३ कारवायांतून प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे नगर परिषदेने या मोहिमेतून २.४२५ टन प्लास्टीक साहित्य जप्त केले आहे. यातमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल शिट, थर्माकोल प्लेट्स व अन्य भांडे याशिवाय बंदी असलेल्या साहित्यांचा समावेश आहे.ट्रान्सपोर्ट कंपनीतून १.५० टन माल जप्तनगर परिषदेने शहरात कित्येक दुकानांतील प्लास्टिक साहित्य जप्त करून त्यांना दंड ठोठावला आहे. मात्र सर्कस मैदान जवळील गोंदिया फ्रेट कंपनी या ट्रान्पोर्ट कंपनीतून पथकाने धाड घालून १.५० टन प्लास्टिक साहित्य जप्त केले होते. तसेच ही त्यांच्यावरील पहिली कारवाई असल्यामुळे त्यांना पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता.पुन्हा सुरू झाली जनजागृती मोहीमराज्यात आलेल्या नव्या शासनातील पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी प्लास्टीक वापराचा हा विषय गांभीर्याने घेतला असून सिंगल यूज प्लास्टिक मुक्त राज्य बनविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यांतर्गत सर्व नगर पालिका, महानगरपालिका, नगर पंचायतींना नव्याने प्लास्टिक बंदीसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नगर परिषदेने पुन्हा मोहीम छेडली असून प्लास्टिक वापरू नये याबाबत व्यापाऱ्यांना भेटून जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी