शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

प्लास्टिकबंदी मोहिमेतून १.६५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देसुमारे अडीच टन साहित्य जप्त : नगर परिषद पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना नगर परिषदेच्या पथकाने शहरात ३३ कारवाया करून प्रत्येकी प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे, बंदी लावण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकमध्ये येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांचा अतिरेकी वापर सर्वात जास्त हानीकारक ठरत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरिही त्याचे परिपूर्ण अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.प्लास्टीक बंदी अंतर्गत नगर परिषदेने २५ जून २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशेष मोहीम राबवून प्लास्टीक विक्रे ते दुकानदारांवर कारवाई केली. नगर परिषदेच्या या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २१६ दुकानदारांवर धाड घालून त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त केले आहे.याशिवाय ३३ कारवायांतून प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे नगर परिषदेने या मोहिमेतून २.४२५ टन प्लास्टीक साहित्य जप्त केले आहे. यातमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल शिट, थर्माकोल प्लेट्स व अन्य भांडे याशिवाय बंदी असलेल्या साहित्यांचा समावेश आहे.ट्रान्सपोर्ट कंपनीतून १.५० टन माल जप्तनगर परिषदेने शहरात कित्येक दुकानांतील प्लास्टिक साहित्य जप्त करून त्यांना दंड ठोठावला आहे. मात्र सर्कस मैदान जवळील गोंदिया फ्रेट कंपनी या ट्रान्पोर्ट कंपनीतून पथकाने धाड घालून १.५० टन प्लास्टिक साहित्य जप्त केले होते. तसेच ही त्यांच्यावरील पहिली कारवाई असल्यामुळे त्यांना पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता.पुन्हा सुरू झाली जनजागृती मोहीमराज्यात आलेल्या नव्या शासनातील पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी प्लास्टीक वापराचा हा विषय गांभीर्याने घेतला असून सिंगल यूज प्लास्टिक मुक्त राज्य बनविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यांतर्गत सर्व नगर पालिका, महानगरपालिका, नगर पंचायतींना नव्याने प्लास्टिक बंदीसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नगर परिषदेने पुन्हा मोहीम छेडली असून प्लास्टिक वापरू नये याबाबत व्यापाऱ्यांना भेटून जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी