शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

पावसाअभावी रोवण्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकºयांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त । तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा (बुजरुक) : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या बंद असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील ८-१० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे. सध्या परिसरात नदी किनाऱ्यालगतच्या ज्या शेती आहेत त्यांनी नदी काठावर विद्युत मोटार पंप लावून रोवणी सुरु केली आहे. यात करटी खुर्द, इंदोरा बुज., बिहिरीया, चांदोरी खुर्द, सावरा, पिपरीया, अर्जुनी येथील शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे रोवणी करीत आहेत.तसेच ज्यांच्याकडे विहीर व तलाव आहेत त्यांचे सुद्धा रोवणीचे काम सुरु आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे कुठलेच साधन नाही ते अजून रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.मागील १३ जुलैपासून ढगाळ वातावरण व पाऊस येईल असे वातावरण असताना सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली नाही. कुठे-कुठे थोडाफार पाऊस झाला. परंतु शेतात पाणी साचले नाही. पावसाळा लागला तेव्हापासून तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही व तलाव, नाले अजून भरले नाहीत. मृग नक्षत्रामध्ये धानाची पेरणी झाली व फक्त रोपे जगण्या पुरताच पाऊस आला. आता पुनर्वसू नक्षत्र संपणार आहे. १९ जुलैपासून पुष्प नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असून या नक्षत्रामध्ये हत्ती सोंड हलवितो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाणी मिळावे म्हणून धापेवाडा उपसा सिंचन योजनेमधून चोरखमारा, बोदलकसा, खैरबंधा तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सिंचन योजनेतून तलावात पाणी गेले ही असेल. परंतु खैरबंधा जलाशयाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत केव्हा येईल व रोवणीच्या कामाला केव्हा सुरुवात होईल याचीही चिंता शेतकऱ्यांना आहे.या जलाशयाच्या शेवटच्या टोकावरची गावे अर्जुनी, परसवाडा, बघोली, इंदोरा बुज., बिहिरीया, करटी बुज., करटी खुर्द, खैरलांजी, सावरा, पिपरीया, गोंडमोहाळी, किंडगीपार ही आहेत. या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी येईल का यात शंकाच वाटत आहे. तेव्हापर्यंत जुलै महिना संपेल व ऑगस्टच्या २ तारखेला आलेल्या नक्षत्राची सुरुवात होईल. या चिंतेमध्ये शेतकरी लागला आहे. तेव्हा परिसरात दमदार पाऊस केव्हा होईल या आशेवर शेतकरी आहे.ज्यांनी रोवणी केली तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण रोवणी करुन पाणी नसल्याने पऱ्हे वाळलेली आहेत. ज्यांची रोवणी झाली नाही तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण शेतामधील खारी सुद्धा पिवळ्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी