शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाअभावी रोवण्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकºयांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त । तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा (बुजरुक) : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या बंद असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील ८-१० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे. सध्या परिसरात नदी किनाऱ्यालगतच्या ज्या शेती आहेत त्यांनी नदी काठावर विद्युत मोटार पंप लावून रोवणी सुरु केली आहे. यात करटी खुर्द, इंदोरा बुज., बिहिरीया, चांदोरी खुर्द, सावरा, पिपरीया, अर्जुनी येथील शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे रोवणी करीत आहेत.तसेच ज्यांच्याकडे विहीर व तलाव आहेत त्यांचे सुद्धा रोवणीचे काम सुरु आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे कुठलेच साधन नाही ते अजून रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.मागील १३ जुलैपासून ढगाळ वातावरण व पाऊस येईल असे वातावरण असताना सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली नाही. कुठे-कुठे थोडाफार पाऊस झाला. परंतु शेतात पाणी साचले नाही. पावसाळा लागला तेव्हापासून तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही व तलाव, नाले अजून भरले नाहीत. मृग नक्षत्रामध्ये धानाची पेरणी झाली व फक्त रोपे जगण्या पुरताच पाऊस आला. आता पुनर्वसू नक्षत्र संपणार आहे. १९ जुलैपासून पुष्प नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असून या नक्षत्रामध्ये हत्ती सोंड हलवितो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाणी मिळावे म्हणून धापेवाडा उपसा सिंचन योजनेमधून चोरखमारा, बोदलकसा, खैरबंधा तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सिंचन योजनेतून तलावात पाणी गेले ही असेल. परंतु खैरबंधा जलाशयाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत केव्हा येईल व रोवणीच्या कामाला केव्हा सुरुवात होईल याचीही चिंता शेतकऱ्यांना आहे.या जलाशयाच्या शेवटच्या टोकावरची गावे अर्जुनी, परसवाडा, बघोली, इंदोरा बुज., बिहिरीया, करटी बुज., करटी खुर्द, खैरलांजी, सावरा, पिपरीया, गोंडमोहाळी, किंडगीपार ही आहेत. या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी येईल का यात शंकाच वाटत आहे. तेव्हापर्यंत जुलै महिना संपेल व ऑगस्टच्या २ तारखेला आलेल्या नक्षत्राची सुरुवात होईल. या चिंतेमध्ये शेतकरी लागला आहे. तेव्हा परिसरात दमदार पाऊस केव्हा होईल या आशेवर शेतकरी आहे.ज्यांनी रोवणी केली तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण रोवणी करुन पाणी नसल्याने पऱ्हे वाळलेली आहेत. ज्यांची रोवणी झाली नाही तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण शेतामधील खारी सुद्धा पिवळ्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी