शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आर्थिक संपन्नतेसाठी योजना राबवा

By admin | Updated: December 22, 2015 02:00 IST

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची

गोंदिया : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ज्या योजनांमुळे सुधारता येईल, अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश पालक सचिव पी.एस. मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १९ डिसेंबर रोजी जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ चा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मीना पुढे म्हणाले, जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नियोजन करावे. मजुरांना निर्धारित वेळेत त्यांची मजुरी द्यावी. या योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या विहिरींची कामे त्वरित करून विविध घटकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले.कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. कृषी व वन विभागाने समन्वयातून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करावी असे सांगून मीना म्हणाले, त्यामुळे फळांमधून जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. ठिबक सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. तसेच सौर कुंपनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शेतीसोबतच जंगलाचे संरक्षण होईल. जंगलाचे संरक्षण व संवर्धनासाठी आदिवासी उपयोजनेचा निधी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी वापरता येईल, असेही मीना या वेळी म्हणाले.या वेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ अखेर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तलावांतील गाळ काढून मत्स्योत्पादनावर भर द्या४जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या माजी मालगुजारी तलावातील गाळ काढावे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय इमारतींचे बांधकाम करताना कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. कामाची देखरेख चांगल्याप्रकारे झाली पाहिजे, असे सांगून मीना म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत या तलावांमधून मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांना सहकार्य करावे.