शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

आर्थिक संपन्नतेसाठी योजना राबवा

By admin | Updated: December 22, 2015 02:00 IST

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची

गोंदिया : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ज्या योजनांमुळे सुधारता येईल, अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश पालक सचिव पी.एस. मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १९ डिसेंबर रोजी जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ चा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मीना पुढे म्हणाले, जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नियोजन करावे. मजुरांना निर्धारित वेळेत त्यांची मजुरी द्यावी. या योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या विहिरींची कामे त्वरित करून विविध घटकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले.कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. कृषी व वन विभागाने समन्वयातून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करावी असे सांगून मीना म्हणाले, त्यामुळे फळांमधून जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. ठिबक सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. तसेच सौर कुंपनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शेतीसोबतच जंगलाचे संरक्षण होईल. जंगलाचे संरक्षण व संवर्धनासाठी आदिवासी उपयोजनेचा निधी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी वापरता येईल, असेही मीना या वेळी म्हणाले.या वेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ अखेर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तलावांतील गाळ काढून मत्स्योत्पादनावर भर द्या४जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या माजी मालगुजारी तलावातील गाळ काढावे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय इमारतींचे बांधकाम करताना कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. कामाची देखरेख चांगल्याप्रकारे झाली पाहिजे, असे सांगून मीना म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत या तलावांमधून मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांना सहकार्य करावे.