शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिक्चर अभी बाकी है

By admin | Updated: January 24, 2016 01:42 IST

तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यातूनच सुमारे चार हजार चार कोटींची कामे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून लवकरच त्यांना सुरूवात होणार आहे.

नितीन गडकरी : राज्यमार्ग कोनशिला समारंभ गोंदिया : तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यातूनच सुमारे चार हजार चार कोटींची कामे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून लवकरच त्यांना सुरूवात होणार आहे. या विकास कामांचा शुभारंभ झाला असून ही तर सुरूवात असून ‘पिक्चर अभी बाकी है’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील नवीन ग्रेन मार्केटमध्ये शनिवारी (दि.२३) आयोजित राज्यमार्गांच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, संजय पुराम, गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, वरिष्ठ नेते अशोक इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार गडकरी यांनी गोंदिया व भंडारा जिल्हा जंगलांचा जिल्हा आहे. त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने फायदा असून विदर्भ पर्यटनासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच लाखोळीच्या डाळीवर निर्बंध उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी धानासह लाखोळीचेही उत्पादन घ्यावे. शिवाय तणसापासून इथेनॉल तयार होत असल्याने त्याचा प्रयोग सुरू करून शेतकऱ्यांकडील तणस खरेदी केला जाणार. त्यातूनही शेतकऱ्यांना आर्थिक आवक होणार आहे. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मदत केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री बडोले यांनी, गडकरींनी पाच वर्षांचे टार्गेट एका वर्षातच पूर्ण केल्याचे म्हणत, दुर्भाग्याने जिल्ह्याला मागास जिल्हा म्हटले जाते. मात्र गडकरींची नेहमीच या जिल्ह्यावर नजर राहात असल्याने ही साडेचार हजार कोटींची कामे जिल्ह्याला मिळाल्याचे मत व्यक्त केले. खासदार पटोले यांनी, निवडणूकांपूर्वीचे हे भूमिपूजन नसून, आम्हाला निसर्गाने खूप काही दिले मात्र त्याला दिशा मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन व शेतीवर आधारीत उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी गडकरींकडे केली. संचालन जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केले. आभार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)भव्य पुष्पहाराने स्वागतकार्यक्रमात जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून ना.गडकरी यांचे भव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना एक हजार कोटींच्या निधीची मागणी करीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.